शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

सहा वर्षांत एकाही बालमजुराचा शोध लागला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:04 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़

ठळक मुद्देबालमजुरी वाढतेय, बालमजुरांसाठी वय झाले १८ वर्षे मागील वर्षी सापडला एक बालकामगार

भारत दाढेल ।नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील काही वर्षांत बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले होते़ परंतु जिल्ह्यात हजारो बालमजूर आहेत़ कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत़ आई, वडिलांच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित, वंचित जाती-जमातीची मुले बालमजुरीकडे वळतात़या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न झाले नाहीत. शासनाने सन २०१६ ला बाल व किशोरवयीन प्रतिबंधक नियमन अधिनियम अंमलात आणला़ त्यानुसार १४ वर्षांखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे़१४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसाय करण्यास लावणे आणि प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असला तरी जिल्ह्यात हजारो बालके धोक्याच्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत़ आता १८ वर्षांखालील बालक बालमजूर म्हणून गणल्या जात आहे़४०० रूपये शिष्यवृत्तीबालमजूर दररोज १५० ते २०० रूपये कमावतात़ सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला ४०० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते़ त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे़ बालमजुरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत़ काही वडिलांच्या व्यसनामुळे बालमजुरी फोफावत आहे़ कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बालमजुरांची पाहणी केली जाते़ त्यानुसार २०१२ ते २०१७ या वर्षात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ बालमजुरांच्या संदर्भात तक्रार आल्याशिवाय हे कार्यालय कामच करीत नाही़ मागील वर्षी एका बालमजुराला पकडण्यात आले होते़काय सांगतो कायदा...?१४ वर्षांखालील बालकास व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असून फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार व कमाल ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होवू शकते़ गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ३ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा़ किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा़

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक