शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

सहा वर्षांत एकाही बालमजुराचा शोध लागला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:04 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़

ठळक मुद्देबालमजुरी वाढतेय, बालमजुरांसाठी वय झाले १८ वर्षे मागील वर्षी सापडला एक बालकामगार

भारत दाढेल ।नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील काही वर्षांत बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले होते़ परंतु जिल्ह्यात हजारो बालमजूर आहेत़ कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत़ आई, वडिलांच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित, वंचित जाती-जमातीची मुले बालमजुरीकडे वळतात़या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न झाले नाहीत. शासनाने सन २०१६ ला बाल व किशोरवयीन प्रतिबंधक नियमन अधिनियम अंमलात आणला़ त्यानुसार १४ वर्षांखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे़१४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसाय करण्यास लावणे आणि प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असला तरी जिल्ह्यात हजारो बालके धोक्याच्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत़ आता १८ वर्षांखालील बालक बालमजूर म्हणून गणल्या जात आहे़४०० रूपये शिष्यवृत्तीबालमजूर दररोज १५० ते २०० रूपये कमावतात़ सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला ४०० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते़ त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे़ बालमजुरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत़ काही वडिलांच्या व्यसनामुळे बालमजुरी फोफावत आहे़ कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बालमजुरांची पाहणी केली जाते़ त्यानुसार २०१२ ते २०१७ या वर्षात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ बालमजुरांच्या संदर्भात तक्रार आल्याशिवाय हे कार्यालय कामच करीत नाही़ मागील वर्षी एका बालमजुराला पकडण्यात आले होते़काय सांगतो कायदा...?१४ वर्षांखालील बालकास व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असून फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार व कमाल ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होवू शकते़ गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ३ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा़ किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा़

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक