शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

सिंदखेड पोलीस ठाणे स्थलांतराचे कोडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:32 AM

काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

श्रीक्षेत्र माहूर / वाई बाजार : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले निजामकालीन सिंदखेड पोलीस ठाण्याची जीर्ण इमारत, त्यातच कोणत्याही भौतिक सुविधेविना पोलीस कर्मचाऱ्यांंना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत पाहता मागील काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.एकेकाळी विजयकुमार नामक नक्षलवाद्याच्या नक्षली कारवायामुळे चर्चेत आलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या या इमारतीचे बांधकाम निजामकालीन आहे. वाई बाजार, सारखणी या मुख्य रहदारीच्या बाजार पेठेसह एकूण ५२ गावच्या सुरक्षेची जबाबदारी याच सिंदखेड पोलिस ठाण्याकडे आहे. माहूर-किनवट राज्य मार्गापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या या जीर्ण ठाणे इमारतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधेशिवाय कर्मचाºयांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. दरम्यान, एका सहायक पोलिस निरिक्षकासह एकूण ३२ कर्मचाºयांची नियुक्ती आहे. त्यापैकी ३ पोलीस कर्मचारी न्यायालयीन कामकाज, ३ कर्मचारी समंस व वारंट तामील करण्यासाठी, १ आमदारांचे अंगरक्षक, तर कर्मचारी ३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. परिणामी उर्वरीत २२ कर्मचारी हे ५२ गावात वसलेल्या २६ हजार लोकसंख्येच्या सुरक्षेची खबरदारी घेत आहेत. कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतांना देखील पुरक सोयी सुविधांअभावी कर्तव्य पार पाडतांना कर्मचारी वर्गाचे मानसिक संतुलन बिघडणे स्वाभाविकच आहे.याबाबत अनेकवेळा निवेदने व पाठपुरावा करून भौतिक सुविधेसाठी ठाणे इतरत्र हलवण्याची मागणी झाली. परंतु आदिवासी व दुर्गम भागातील सिंदखेड पोलिस ठाणे इतरत्र हलवण्याची प्रक्रिया अद्यापही दुर्लक्षितच आहे.भौतिक सुविधेअभावी दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या सिंदखेड पोलिस ठाण्यास गृह विभागामार्फत सोईच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी मागील काळात हालचाली झाल्या़ परंतु अद्याप स्थलातराची कार्यवाही शुन्यच आहे. त्यातच अपुºया संख्याबळावर दुर्गम भागातून कायदा व सुव्यवस्थेची अत्यावश्यक सेवा देणे सिंदखेड पोलिसांना अवघड बनले असून प्रसंगी तारेवरची कसरत ठरते.जनतेच्या सेवातत्परतेसाठी पोलीस ठाणे मोक्याच्या ठिकाणी असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. पोलिस ठाणे वाईबाजार सारख्या मोक्याच्या ठिकाणी असल्यास नागरीकांना तत्पर सेवा देणे शक्य होईल़ तसेच पोलीस कर्मचाºयांचीही हेळसांड होणार नाही. त्यामुळे ठाणे स्थलांतर करावे, अशी मागणी आहे़

वाई बाजार येथे पोलीस ठाणे स्थलांतरीत केल्यास वाई बाजारसह परिसरातील छुप्या पध्दतीने सुरू असलेले अवैध व्यवसायावर अंकुश लागेल. सोबतच अतिसंवेदनशील म्हणून गणल्या जाणा-या वाईबाजार मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पोलीस कर्मचा-यांना कर्तव्यात भौतिक अडचणी येणार नाहीत. यासाठी वाईबाजार हेच योग्य ठिकाण आहे - बाबाराव कंधारे, सामाजिक कार्यकर्ता, वाई बाजार

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसPolice Stationपोलीस ठाणे