शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

सुटकेचा नि:श्वास! मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 19:33 IST

२००८ मध्ये एका वादातून तो तुरुंगात गेला अन् कुख्यात आरोपींच्या संपर्कात येऊन त्याचे आयुष्यच बदलून गेले.

नांदेड: खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाच्या साथीदारांनी येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला नोव्हेंबरमध्ये सात महिने होतात. शनिवारी बियाणी यांचा जन्मदिवस होता. त्यानिमित्त शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. योगायोग म्हणजे शनिवारीच रिंदा याचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नांदेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला.

हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा हा पंजाबमधील तरणतारण येथील रहिवासी होता. २००८ मध्ये एका वादातून तो तुरुंगात गेला अन् कुख्यात आरोपींच्या संपर्कात येऊन त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्यापूर्वी तो सामान्य जीवन जगत होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो नांदेडात आला. त्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात एक-एक पाऊल टाकण्यास त्याने सुरुवात केली. खलिस्तानीच्या नावावर त्याने येथील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माळी कुटुंबीयासोबतच्या पूर्ववैमनस्यातून त्याने बच्चितरसिंघ माळी यांचा खून केला. तसेच माळी कुटुंबीयांशी घनिष्ट संबंध असलेल्या अनेकांना धमकाविणे, गोळीबार केला. मात्र, पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्याची हिमंत वाढतच गेली. त्यानंतर त्याने खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्याचा सपाटा लावला. त्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार केला होता. आजही कोकुलवार हे अंथरुणाला खिळून आहेत. त्याचबरोबर शहरातील इतरही व्यापाऱ्यांवर गोळीबाराच्या घटना घडल्या. 

रिंदाच्या दहशतीने अनेकांनी त्याला कोट्यवधींची खंडणी दिली. तर काहीजण पोलिसांकडे गेले. पोलिसांकडून अशा व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात आली; परंतु सर्वाधिक खळबळ उडाली ती ५ एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येने. बियाणी यांना रिंदाने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती; परंतु खंडणी मिळत नसल्याने अद्दल घडविणे आणि दहशत कायम ठेवणे, या उद्देशाने त्याच्या साथीदारांनी घरासमोरच बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या. बियाणी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या प्रकरणात पोलिसांवरही प्रचंड दबाव होता. एसआयटीने या प्रकरणात एक-एक कडी जोडत आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली. तर दिल्ली पोलिसांनी एका शार्प शूटरला पकडले. तर रिंदा यांचा पाकीस्तानात मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे गेली काही वर्षे दहशतीत असलेल्या नांदेडकरांनीही सुटकेचा श्वास सोडला.

२०२० मध्ये पाकीस्तानातरिंदा हा २०२० मध्ये पाकिस्तानात पळून गेल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी आयएसआयच्या इशाऱ्यावरून तो भारतात देशविघातक कारवाया करीत होता. 

पंजाबला २३ गुन्ह्यांत हवा होता रिंदापाकिस्तानमध्ये गेल्यानंतर खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी करणाऱ्या रिंदावर पंजाबमध्ये खून, खंडणी, लूटमार असे जवळपास २३ गुन्हे दाखल आहेत. पंजाबमध्ये रुपनगर, पटीयाला, लुधियाना आणि जालंधर या परिसरात त्याची दशहत होती. लुधियाना न्यायालय, मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातही रिंदाचा सहभाग होता. नांदेडमध्येही रिंदावर खून, खंडणी यासह अनेक गुन्हे आहेत.

शार्प शुटरचा शोध सुरुअन्य एक शार्प शूटर आणि मुख्य आरोपी रिंदा हा फरार होता. त्यातच शनिवारी संजय बियाणी यांच्या जन्मदिवशीच रिंदाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकले.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादी