शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात ४१ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:22 IST

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़

ठळक मुद्देस्वयंसेवकांच्या परिश्रमाने दिमाखदार सोहळा

नांदेड : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़ अशा कुटुंबाच्या मदतीला साईप्रसाद ही स्वयंसेवकांची संघटना धावून जाते़ बुधवारी साईप्रसादच्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात अशाच कुटुंबातील ४१ जोडप्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या़ स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे संकटात सापडलेल्या या जोडप्यांच्या नवआयुष्याला सुरुवात झाली आहे़सनई, चौघड्याचा मंजुळ स्वर, १ लाख चौरस फुटांचा भव्य मंडप, ५०० फूट लांबीचे व्यासपीठ या सोहळ्यासाठी उभारण्यात आले होते़ कोणताही पदाधिकारी किंवा अध्यक्ष व्यासपीठावर न जाता संतांच्या आशीर्वादात दिमाखदार सोहळा पार पडला़ आतापर्यंत साईप्रसादच्या वतीने अशा सोहळ्याच्या माध्यमातून २२९ विवाह लावून दिले आहेत़ यंदाच्या सोहळ्यातील ४१ जोडप्यांपैकी ८ वधू-वरांचे वडील हयात नाहीत़ ३ जोडप्यांच्या डोक्यावरुन आई अन् वडील दोघांचेही छत्र हरवले आहे़ अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील जोडपेही आजच्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकले़ सकाळी साडेसहा वाजेपासूनच वधू-वरांच्या आगमनाला सुरुवात झाली होती़ प्रत्यक वºहाडाला स्वतंत्र खोली देण्यात आली होती़सोहळ्यामध्ये वधू पक्षाची बाजू सांभाळत साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली़ सकाळी चहा-नाश्ता व त्यानंतर जेवण अशी व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारी सव्वा दोन वाजता मंगलमय वातावरणात या जोडप्यांवर फुलांचा अक्षदा टाकण्यात आला़ सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी संत बाबा कुलवंतसिंघजी, संत श्री नरेंद्रसिंघजी महाराज, संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा प्रेमसिंघजी, संत बाबा ज्योतिंदरसिंघजी यांची उपस्थिती होती़ जवळपास पंधरा हजार वºहाडींची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती़ परंतु, कुठेही रुसवा-फुगवा नाही़ स्वयंसेवकांनीही आपल्याच घरातील लग्नकार्य आहे, या भावनेतून हातभार लावला़अंगणात जावून लावणार लग्नवसमत तालुक्यातील हट्टा येथे नानासाहेब भवर यांच्या मुलीचे ७ मे २०१९ रोजी लग्न ठरले होते़ परंतु पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे २८ मार्च रोजी नानासाहेब यांनी आत्महत्या केली़ भवर कुुटुंबाला २० गुंठे जमीन असून ते मजुरी करतात़ त्यांच्या मदतीसाठी साईप्रसादने त्यांच्या मुलीचा त्यांच्या अंगणात जावून लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या जोडप्याला संसारोपयोगी सर्व वस्तू देण्यात येणार आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक