शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नांदेडात ४१ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:22 IST

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़

ठळक मुद्देस्वयंसेवकांच्या परिश्रमाने दिमाखदार सोहळा

नांदेड : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़ अशा कुटुंबाच्या मदतीला साईप्रसाद ही स्वयंसेवकांची संघटना धावून जाते़ बुधवारी साईप्रसादच्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात अशाच कुटुंबातील ४१ जोडप्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या़ स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे संकटात सापडलेल्या या जोडप्यांच्या नवआयुष्याला सुरुवात झाली आहे़सनई, चौघड्याचा मंजुळ स्वर, १ लाख चौरस फुटांचा भव्य मंडप, ५०० फूट लांबीचे व्यासपीठ या सोहळ्यासाठी उभारण्यात आले होते़ कोणताही पदाधिकारी किंवा अध्यक्ष व्यासपीठावर न जाता संतांच्या आशीर्वादात दिमाखदार सोहळा पार पडला़ आतापर्यंत साईप्रसादच्या वतीने अशा सोहळ्याच्या माध्यमातून २२९ विवाह लावून दिले आहेत़ यंदाच्या सोहळ्यातील ४१ जोडप्यांपैकी ८ वधू-वरांचे वडील हयात नाहीत़ ३ जोडप्यांच्या डोक्यावरुन आई अन् वडील दोघांचेही छत्र हरवले आहे़ अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील जोडपेही आजच्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकले़ सकाळी साडेसहा वाजेपासूनच वधू-वरांच्या आगमनाला सुरुवात झाली होती़ प्रत्यक वºहाडाला स्वतंत्र खोली देण्यात आली होती़सोहळ्यामध्ये वधू पक्षाची बाजू सांभाळत साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली़ सकाळी चहा-नाश्ता व त्यानंतर जेवण अशी व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारी सव्वा दोन वाजता मंगलमय वातावरणात या जोडप्यांवर फुलांचा अक्षदा टाकण्यात आला़ सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी संत बाबा कुलवंतसिंघजी, संत श्री नरेंद्रसिंघजी महाराज, संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा प्रेमसिंघजी, संत बाबा ज्योतिंदरसिंघजी यांची उपस्थिती होती़ जवळपास पंधरा हजार वºहाडींची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती़ परंतु, कुठेही रुसवा-फुगवा नाही़ स्वयंसेवकांनीही आपल्याच घरातील लग्नकार्य आहे, या भावनेतून हातभार लावला़अंगणात जावून लावणार लग्नवसमत तालुक्यातील हट्टा येथे नानासाहेब भवर यांच्या मुलीचे ७ मे २०१९ रोजी लग्न ठरले होते़ परंतु पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे २८ मार्च रोजी नानासाहेब यांनी आत्महत्या केली़ भवर कुुटुंबाला २० गुंठे जमीन असून ते मजुरी करतात़ त्यांच्या मदतीसाठी साईप्रसादने त्यांच्या मुलीचा त्यांच्या अंगणात जावून लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या जोडप्याला संसारोपयोगी सर्व वस्तू देण्यात येणार आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक