शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात ४१ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:22 IST

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़

ठळक मुद्देस्वयंसेवकांच्या परिश्रमाने दिमाखदार सोहळा

नांदेड : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़ अशा कुटुंबाच्या मदतीला साईप्रसाद ही स्वयंसेवकांची संघटना धावून जाते़ बुधवारी साईप्रसादच्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात अशाच कुटुंबातील ४१ जोडप्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या़ स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे संकटात सापडलेल्या या जोडप्यांच्या नवआयुष्याला सुरुवात झाली आहे़सनई, चौघड्याचा मंजुळ स्वर, १ लाख चौरस फुटांचा भव्य मंडप, ५०० फूट लांबीचे व्यासपीठ या सोहळ्यासाठी उभारण्यात आले होते़ कोणताही पदाधिकारी किंवा अध्यक्ष व्यासपीठावर न जाता संतांच्या आशीर्वादात दिमाखदार सोहळा पार पडला़ आतापर्यंत साईप्रसादच्या वतीने अशा सोहळ्याच्या माध्यमातून २२९ विवाह लावून दिले आहेत़ यंदाच्या सोहळ्यातील ४१ जोडप्यांपैकी ८ वधू-वरांचे वडील हयात नाहीत़ ३ जोडप्यांच्या डोक्यावरुन आई अन् वडील दोघांचेही छत्र हरवले आहे़ अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील जोडपेही आजच्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकले़ सकाळी साडेसहा वाजेपासूनच वधू-वरांच्या आगमनाला सुरुवात झाली होती़ प्रत्यक वºहाडाला स्वतंत्र खोली देण्यात आली होती़सोहळ्यामध्ये वधू पक्षाची बाजू सांभाळत साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली़ सकाळी चहा-नाश्ता व त्यानंतर जेवण अशी व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारी सव्वा दोन वाजता मंगलमय वातावरणात या जोडप्यांवर फुलांचा अक्षदा टाकण्यात आला़ सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी संत बाबा कुलवंतसिंघजी, संत श्री नरेंद्रसिंघजी महाराज, संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा प्रेमसिंघजी, संत बाबा ज्योतिंदरसिंघजी यांची उपस्थिती होती़ जवळपास पंधरा हजार वºहाडींची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती़ परंतु, कुठेही रुसवा-फुगवा नाही़ स्वयंसेवकांनीही आपल्याच घरातील लग्नकार्य आहे, या भावनेतून हातभार लावला़अंगणात जावून लावणार लग्नवसमत तालुक्यातील हट्टा येथे नानासाहेब भवर यांच्या मुलीचे ७ मे २०१९ रोजी लग्न ठरले होते़ परंतु पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे २८ मार्च रोजी नानासाहेब यांनी आत्महत्या केली़ भवर कुुटुंबाला २० गुंठे जमीन असून ते मजुरी करतात़ त्यांच्या मदतीसाठी साईप्रसादने त्यांच्या मुलीचा त्यांच्या अंगणात जावून लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या जोडप्याला संसारोपयोगी सर्व वस्तू देण्यात येणार आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक