शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे मानकरी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:50 IST

दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.

कंधार : दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगावची खंडोबा यात्रा आपल्या खास वैशिष्ट्याने उत्तर भारतातील भाविक - भक्तांचे आकर्षण ठरले आहे. उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी आपला घोडेबाजार आता सर्वांना आकर्षण वाटणारा निर्माण केला आहे. पूर्वीचे यात्रेचे स्वरूप आता कालौघात बदलले आहे. महिनाभरची यात्रा मोजक्या दिवसांवर आली. परंतु, यात्रेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाने कलावंत, भाविक, शेतकरी, शेतमजूर, भटके विमुक्त आदींसाठी नानाविध कार्यक्रम एक मेजवाणी ठरते.यात्रा परिसर, मंदिर परिसर, धर्मशाळा, पालखी रस्ता, पशुधन शेड, सभामंडप, वाहनतळ, भोजनगृह आदींची सोयी झाली आहे. माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांनी विकासासाठी मोठा निधी दिला. त्यामुळे अनेक कामे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निधी उपलब्ध करून दिला. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावा केला. यात्रा विकासासाठी प्रयत्न केले. या कामात मात्र मानकरी दुर्लक्षित राहिले, अशीच परिस्थिती आहे.यात्रेची सुरूवात करणारे, पागोटे (मुंडासे) मुख्य पालखीत ठेवल्या शिवाय पालखी मिरवणूक निघत नाही. सट व देवस्वारी या दोन्हीवेळी पानभोसीच्या भोसीकर कुटुंबाचा ‘मुंडासेमान’ असतो. आणि नवीन मुंडासे वस्त्र कुरूळा येथील महाजन आणतात. छत्रीचे मानकरी शिराढोण येथील पांडागळे हे आहेत. मुख्य पालखीसमोरची पालखी मानकरी हे रिसनगावचे नाईक आहेत. या मानकºयाशिवाय यात्रा अपूर्ण आहे. परंतु, या मानकºयांना माळेगावात अद्याप पक्का निवारा उपलब्ध करून देता आला नाही. स्वत: व गावातील सोबत आलेल्या भाविक - भक्तांना राहुटीत गारठ्यात रात्र काढावी लागते. पदरमोड करून गावकºयांना दिलासा द्यावा लागतो. कोटीचा खर्च, विविध बांधकामे होत असताना मानकरी केंद्रस्थानी येणे गरजेचे आहे. मात्र आजपर्यंत तसे झाले नाही. आता रिसनगावच्या नाईकांना २५ लाखांतून सभागृह बांधून दिले जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. इतर तीन मानकºयांना असा योग कधी येणार? असा सवाल मानक-यांच्या गावातून व भाविक - भक्तांतून केला जात आहे.

पक्का निवारा नसल्याने मानक-यांची परवडमुंडासे (पागोटे), पूजा अर्चा, अभिषेक आदींचा मान अनेक पिढीपासून कुटुंबाकडे आहे. यात्राकाळात गावकºयांसोबत शेकडो जण असतात. परंतु, निवारा पक्का नसल्याने त्रास होतो. खर्च पदरमोड करावा लागतो. आता सततच्या दुष्काळाने आर्थिक ताण सहन होत नाही. निवारा व खर्च तरतूद केली तर सोयीचे होईल - खुशालराव भगवानराव पा.भोसीकर, पानभोसी ता.कंधारश्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत मानक-यांना निवारा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. रिसनगावच्या नाईक यांना मुख्यमंत्री निधीतून २५ लाखांचे सभागृह मंजूर झाले आहे. इतर मानकºयांना तशी सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायतचा पाठपुरावा निवेदनाद्वारे करणार आहे -विजय वाघमारे (ग्रामपंचायत सदस्य, माळेगाव, ता.लोहा)

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळे