शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

धक्कादायक! अर्धापूर तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 19:27 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा व बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

- गोविंद टेकाळे अर्धापूर (नांदेड) : शेतीवर येणारी सततची संकटे यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या विवांचनेत सापडलेल्या अर्धापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. एकाच दिवशी दोन घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गारपीट, हवामानातील बदल, नापिकी, वादळी वारे विविध रोगांचा प्रादुर्भाव अवकाळी पाऊस आदी मुळे शेतातील पिकाचे नुकसान, नेहमीच घाट्यात येत असलेली शेती, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा व बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत सापडलेल्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव व बारसगाव येथील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पिंपळगाव महादेव येथील साहेब व्यंकटराव देशमुख (वय ५७) या अल्पभूधारक शेतकऱ्याने अस्मानी संकटामुळे शेतीचे सतत होणारे नुकसान व भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड चे डोक्यावर असलेले कर्ज या विवंचनेत शेतकऱ्याने बौध्द स्मशानभूमी परिसरात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. गेल्या आठ दिवसांपासून देशमुख हे तणावाखाली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील बजरंग शिवराज बारसे वय ४९ वर्ष हे होमगार्ड असून नोकरीसह शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांची बारसगाव शिवारात गट नंबर ८९ मध्ये दोन एकर शेती मयताचे वडील शिवराज बारसे यांच्या नावे असून या शेतीवर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अर्धापूर चे ३ लाख २० हजार रुपये कर्ज  असल्याने व सततच्या अस्मानी संकटामुळे तोट्यात येत असलेली शेती यामुळे कर्ज कसे फेडावे व कुटुंबाचा उद्धार निर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत बजरंग शिवराज बारसे यांनी दि.२४ बुधवार रोजी दुपारी औषध प्रशासन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

तालुक्यातील दोन्ही ठिकाणी आत्महत्या केलेल्या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पाटील व संतोष सूर्यवंशी यांनी पंचनामा करून मयतांचे शव पुढील प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविले सदर प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNandedनांदेडagricultureशेती