शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धर्माबाद बाजार समितीमध्ये १ महिन्यांपासून लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:44 IST

येथील  बाजार समितीचे बीट (लिलाव) एक महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

धर्माबाद (नांदेड ) : येथील  बाजार समितीचे बीट (लिलाव) एक महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये, कमी भावाने खरेदी केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व दंडात्मक कारवाई केली जाईल, असे  जिल्हा उपनिबंधक विभागाकडून पत्र येताच धर्माबाद येथील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. या भीतीने २२ आॅगस्टपासून लिलाव (बीट) करणे बंद केले. 

परिणामी, शेतकऱ्यांचा माल घरातच पडून असून व्यवहारासाठी पैसे नसल्याने अडचणीत सापडला. एकीकडे शासन व्यापाऱ्यांवर योग्य जरब बसवला असला तरीही दुसरीकडे शासनाने तरी खरेदीचा प्रारंभ करायला पाहिजे, असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भावात खाजगी व्यापारी खरेदी करू नये, असा कायदा १९६०-६३ पासून लागू आहे. कायद्यानुसार दुकानदारांचे परवाने रद्द केले जात, आता व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे, दंडात्मक कारवाई होत असल्याने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करणे बंद केले.  यासंदर्भात मुंबई येथे १० सप्टेंबर रोजी बैठक झाली़ त्या बैठकीत एसएमपी कायदा लागू असून एमएसपीला लागू नसल्याचे म्हटले आहे, अशी माहिती सहाय्यक सचिव वैभव देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. तरीही धर्माबाद मार्केटमध्ये बीट चालू होत नसल्याने शंका निर्माण होत आहे. सध्या बाजार समितीवर प्रशासकाचा कारभार असून जिल्हा उपनिबंधक हे नांदेडवरून कारभार  पाहतात.

बाजारात नवीन मूग, उडीद आला असून जुनाही हरभरा, तूर बाजारात येत आहे.२२ आॅगस्ट महिन्यापासून  बीट बंद असल्याने शेतकरी हतबल झाला. व्याजाने घेतलेले पैसे कसे फेडावे ? अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. नाफेड खरेदी केंद्र सुरू नाही, व्यापाऱ्यांनी खरेदीचा लिलाव बंद केला़ माल विकावा कुठे ? असा सवाल बंडी पाटील नरवाडे यांनी केला. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डNandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र