शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निकृष्ट बियाणाप्रकरणी नांदेड जिल्ह्यात आणखी एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:17 IST

महागामोलाचे बियाणे खरेदी करुन पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत़

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील सारस कंपनीविरुद्ध कारवाईकृषी अधीक्षक कार्यालयाकडे १३४२ तक्रारीयापूर्वी इंदौर येथील एका कंपनीविरुोधात गुन्हा दाखल आहे 

नांदेड : निकृष्ट सोयाबीन बियाणाप्रकरणी मध्यप्रदेशातील सारस अ‍ॅग्रो कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा धर्माबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई कृषी विभागाच्यावतीने शुक्रवारी रात्री करण्यात आली़ नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात यापुर्वी इंदौर येथील कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे़

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हतबल झालेला आहे़ त्यातच महागामोलाचे बियाणे खरेदी करुन पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत़ याबाबत संबंधित बियाणे कंपन्यासह विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी मागील काही दिवसांपासून लावुन धरली आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटकर यांनीही हा विषय गांभीर्याने घेत संबंधिताविरुद्ध कारवाईचे निर्देश दिल्यानंतर २९ जून रोजी नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात इंदौर येथील एका कंपनीविरुोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्यानंतर शुक्रवारी मध्यप्रदेशमधील खांडवा येथे कार्यरत असलेल्या मे सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज व क्षेत्रिय अधिकारी राजेंद्र बापुसाजी गुलकरी (यवतमाळ) यांच्या विरुद्ध पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास गोपाळराव अर्धापुरे यांनी फिर्याद दिली़ यावरुन शुक्रवारी रात्री धर्माबाद पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह बियाणे अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुलकरी यांनी सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीसह इगल कंपनीने उत्पादिक केलेले सोयाबीनचे बियाणे आपल्या दुकानदारामार्फत विविध ठिकाणी विक्री केले होते़ या प्रकरणाचा अधिक तपास धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उजगरे हे करीत आहेत़

कृषी अधीक्षक कार्यालयाकडे १३४२ तक्रारीजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तब्बल १३४२ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत़ आधीचेच बियाणे कर्ज काढून घेतले़ आता पुन्हा बियाणांसाठी पैसे कुठून आणायचे असा पेच आता या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व १६ ही तालुक्यातून बियाणे न उगवल्याच्या तक्रारी असल्याने इतर कंपन्याविरुद्धही कृषी विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड