शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

निकृष्ट बियाणाप्रकरणी नांदेड जिल्ह्यात आणखी एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:17 IST

महागामोलाचे बियाणे खरेदी करुन पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत़

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील सारस कंपनीविरुद्ध कारवाईकृषी अधीक्षक कार्यालयाकडे १३४२ तक्रारीयापूर्वी इंदौर येथील एका कंपनीविरुोधात गुन्हा दाखल आहे 

नांदेड : निकृष्ट सोयाबीन बियाणाप्रकरणी मध्यप्रदेशातील सारस अ‍ॅग्रो कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा धर्माबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई कृषी विभागाच्यावतीने शुक्रवारी रात्री करण्यात आली़ नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात यापुर्वी इंदौर येथील कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे़

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हतबल झालेला आहे़ त्यातच महागामोलाचे बियाणे खरेदी करुन पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत़ याबाबत संबंधित बियाणे कंपन्यासह विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी मागील काही दिवसांपासून लावुन धरली आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटकर यांनीही हा विषय गांभीर्याने घेत संबंधिताविरुद्ध कारवाईचे निर्देश दिल्यानंतर २९ जून रोजी नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात इंदौर येथील एका कंपनीविरुोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्यानंतर शुक्रवारी मध्यप्रदेशमधील खांडवा येथे कार्यरत असलेल्या मे सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज व क्षेत्रिय अधिकारी राजेंद्र बापुसाजी गुलकरी (यवतमाळ) यांच्या विरुद्ध पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास गोपाळराव अर्धापुरे यांनी फिर्याद दिली़ यावरुन शुक्रवारी रात्री धर्माबाद पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह बियाणे अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुलकरी यांनी सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीसह इगल कंपनीने उत्पादिक केलेले सोयाबीनचे बियाणे आपल्या दुकानदारामार्फत विविध ठिकाणी विक्री केले होते़ या प्रकरणाचा अधिक तपास धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उजगरे हे करीत आहेत़

कृषी अधीक्षक कार्यालयाकडे १३४२ तक्रारीजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तब्बल १३४२ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत़ आधीचेच बियाणे कर्ज काढून घेतले़ आता पुन्हा बियाणांसाठी पैसे कुठून आणायचे असा पेच आता या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व १६ ही तालुक्यातून बियाणे न उगवल्याच्या तक्रारी असल्याने इतर कंपन्याविरुद्धही कृषी विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड