शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिकच; अंतिम आणेवारीत नुकसानीची दखल घेतली जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:14 IST

Rain Hits Nanded District जिल्ह्यात ८ लाख ४२ हजार ६५४.५९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.

ठळक मुद्दे ७ लाख ८४ हजार ९१३.५ हेक्टर क्षेत्र खरीपाची पेरणी झाली आहे.

नांदेड :  जिल्ह्यात खरीप पीकांची हंगामी पैसेवारी महसूल विभागाने घोषित केली असून संपूर्ण १५६२ गावामध्ये पैसेवारीही ५० पैशापेक्षा अधिक आली आहे. त्यामुळे पीकांची परिस्थिती चांगली असल्याचे स्पष्ट हेात आहे. पण त्याचवेळी अतिवृष्टीचा मोठा फटकाही जिल्ह्यातील खरीप पीकांना बसला आहे.

जिल्ह्यात ८ लाख ४२ हजार ६५४.५९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील ७ लाख ८४ हजार ९१३.५ हेक्टर क्षेत्र खरीपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ३२ हजार ४८३.५१ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले आहे. महसूल विभागाने सप्टेंबर अखेरीस खरीपाची हंगमाी पैसेवारी घोषित केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पैसेवारी ही हिमायतनगर तालुक्यातील आली आहे. ६३ पैसे येथे हंगमाी पैसेवारी आहे. नांदेड तालुक्यात ५६ पैसे, अर्धापूर ५५, कंधार ५३, लोहा ५९, भोकर ५९, मुदखेड ६०, हदगाव ५४, किनवट ५५, माहूर ५५, देगलूर ५५, मुखेड ५४, बिलोली ५४, नायगाव ५८, धर्माबाद ५४, आणि उमरी तालुक्यातही पैसेवारी ६० घोषित केली आहे. पहिल्या टप्यात पावसाने साथ दिल्याने पीकांची वाढ समाधानकारक होती. ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि चांगली असलेली सूगी शेतकर्यांच्या हातून गेल्यात जमा आहे. ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद आदी पीकांना फटका बसला आहे. त्याचवेळी फळबागा व फळपीकांचेही नुकसान झाले आहे. रबी हंगामाच्या पेरणीलाही पावसामुळे विलंब होत आहे. 

खरीपाची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. दुष्काळ जिल्ह्यात १ हजार ५६२ गावातील पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक १९१ गावे किनवट तालुक्यातील आहेत. मुखेड १३५, देगलर १०८, हदगाव १३७, कंधार १२६, लोहा १२७, नांदेड ८८, अर्धापूर ६४, मुदखेड ५५, हिमायतनगर ६४, माहूर ९२, बिलोली ९१, नायगाव ८९, उमरी ६२, आणि धर्माबाद तालुक्यातील ५७ गावांचा समावेश आहे. अथवा अन्य बाबींचा निर्णय हा अंतिम पैसेवारीच घेतला जातो. ही अंतिम पैसेवारी आता अतिवृष्टीच्या नुकसानीची दखल कितपत घेते याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

ओल्या दुष्काळाची मागणीजिल्ह्यात साडेतीन लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात पावसामुळे पीकांचे नुकसान ३३ टक्क्याहून अधिक झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला पसंती दिली होती. मात्र जिल्ह्यात अतिवृष्टी व पावसाचा मोठा फटका याच दोन पीकांना बसला आहे. काढणीस आलेले पीक मातीमोल झालेले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना नजर आणेवारीही ५० पैशापेक्षा अधिक आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरी