शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

खरिपाची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिकच; अंतिम आणेवारीत नुकसानीची दखल घेतली जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:14 IST

Rain Hits Nanded District जिल्ह्यात ८ लाख ४२ हजार ६५४.५९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.

ठळक मुद्दे ७ लाख ८४ हजार ९१३.५ हेक्टर क्षेत्र खरीपाची पेरणी झाली आहे.

नांदेड :  जिल्ह्यात खरीप पीकांची हंगामी पैसेवारी महसूल विभागाने घोषित केली असून संपूर्ण १५६२ गावामध्ये पैसेवारीही ५० पैशापेक्षा अधिक आली आहे. त्यामुळे पीकांची परिस्थिती चांगली असल्याचे स्पष्ट हेात आहे. पण त्याचवेळी अतिवृष्टीचा मोठा फटकाही जिल्ह्यातील खरीप पीकांना बसला आहे.

जिल्ह्यात ८ लाख ४२ हजार ६५४.५९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील ७ लाख ८४ हजार ९१३.५ हेक्टर क्षेत्र खरीपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ३२ हजार ४८३.५१ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले आहे. महसूल विभागाने सप्टेंबर अखेरीस खरीपाची हंगमाी पैसेवारी घोषित केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पैसेवारी ही हिमायतनगर तालुक्यातील आली आहे. ६३ पैसे येथे हंगमाी पैसेवारी आहे. नांदेड तालुक्यात ५६ पैसे, अर्धापूर ५५, कंधार ५३, लोहा ५९, भोकर ५९, मुदखेड ६०, हदगाव ५४, किनवट ५५, माहूर ५५, देगलूर ५५, मुखेड ५४, बिलोली ५४, नायगाव ५८, धर्माबाद ५४, आणि उमरी तालुक्यातही पैसेवारी ६० घोषित केली आहे. पहिल्या टप्यात पावसाने साथ दिल्याने पीकांची वाढ समाधानकारक होती. ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि चांगली असलेली सूगी शेतकर्यांच्या हातून गेल्यात जमा आहे. ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद आदी पीकांना फटका बसला आहे. त्याचवेळी फळबागा व फळपीकांचेही नुकसान झाले आहे. रबी हंगामाच्या पेरणीलाही पावसामुळे विलंब होत आहे. 

खरीपाची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. दुष्काळ जिल्ह्यात १ हजार ५६२ गावातील पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक १९१ गावे किनवट तालुक्यातील आहेत. मुखेड १३५, देगलर १०८, हदगाव १३७, कंधार १२६, लोहा १२७, नांदेड ८८, अर्धापूर ६४, मुदखेड ५५, हिमायतनगर ६४, माहूर ९२, बिलोली ९१, नायगाव ८९, उमरी ६२, आणि धर्माबाद तालुक्यातील ५७ गावांचा समावेश आहे. अथवा अन्य बाबींचा निर्णय हा अंतिम पैसेवारीच घेतला जातो. ही अंतिम पैसेवारी आता अतिवृष्टीच्या नुकसानीची दखल कितपत घेते याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

ओल्या दुष्काळाची मागणीजिल्ह्यात साडेतीन लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात पावसामुळे पीकांचे नुकसान ३३ टक्क्याहून अधिक झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला पसंती दिली होती. मात्र जिल्ह्यात अतिवृष्टी व पावसाचा मोठा फटका याच दोन पीकांना बसला आहे. काढणीस आलेले पीक मातीमोल झालेले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना नजर आणेवारीही ५० पैशापेक्षा अधिक आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरी