शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

१ ते ८ जून या कालावधीतच शाळांनी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:24 IST

१ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करु नये. तर विद्यार्थी प्रवेशाची ही प्रक्रिया १ ते ८ जून या कालावधीत राबवून १० जून रोजी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी वर्गनिहाय शाळेच्या नोटीस बोर्डवर लावावी.

ठळक मुद्देशिक्षण समितीची बैठक १० जून रोजी विद्यार्थ्यांची यादी बोर्डावर लावण्याचे निर्देश

नांदेड : १ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करु नये. तर विद्यार्थी प्रवेशाची ही प्रक्रिया १ ते ८ जून या कालावधीत राबवून १० जून रोजी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी वर्गनिहाय शाळेच्या नोटीस बोर्डवर लावावी. या नोटीसबरोबर शाळेची वर्गनिहाय प्रवेश मर्यादा तसेच शिल्लक जागांची माहितीही द्यावी, असे निर्देश शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले.शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जि. प. सदस्य साहेबराव धनगे, व्यंकटराव गोजेगावकर, मंगाराणी अंबुलगेकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, संध्याताई धोंडगे, ज्योत्स्ना नरवाडे, शिक्षणाधिकारी कुंडगीर, अशोक देवकरे आदींची यावेळी उपस्थिती होती. लातूर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाबाबत नवीन पद्धत अवलंबिली आहे. तीच पद्धत नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अवलंबावी, अशी मागणी जि. प. सदस्य साहेबराव धनगे यांनी केली.धनगे यांनी यावेळी लातूरने राबविलेली प्रक्रियाही सभागृहात मांडली. त्यानुसार १ जून ते ८ जून या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांनी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निश्चित करण्यात आले.१० जून रोजी सर्व शाळांनी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी आपल्या शाळेच्या सूचना फलकावर लावायची आहे. विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश द्यावा, कोणत्याही शाळेला सेमी इंग्रजीसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारता येणार नाही.याबरोबरच विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क घेऊ नये. तसेच गणवेश, वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, शूज आदी वस्तू संबंधित शाळांमधूनच घेणे बंधनकारक करणाऱ्या शाळांविरुद्ध ठोस कार्यवाही करावी. या पद्धतीच्या तक्रारी येणाºया शाळांची मान्यता काढावी, आदी मुद्देही या बैठकीत चर्चेत आले.विद्यार्थी प्रवेश देताना आरक्षण धोरणाचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी शिक्षण विभागाने करावी. वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवाव्यात.कोणत्याही शाळेने प्रवेश देण्याच्या नावाखाली प्रवेश समिती लेखी किंवा तोंडी नियुक्त करु नये, अशी प्रवेश समिती स्थापन केल्यास बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलमानुसार मुख्याध्यापकावर कार्यवाही करावी, असे निर्देशही शिक्षण समितीने शिक्षण विभागाला दिले.दरम्यान, या बैठकीत जातवैधता प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. जिल्हा परिषदेच्या तब्बल ६१ शिक्षकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत. मात्र, त्यानंतरही शासनाच्या निर्देशानुसार या शिक्षकांवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते. या शिक्षकांवर कारवाई करण्यास शिक्षण विभाग टाळाटाळ का करीत आहे? असा प्रश्न करीत प्रमाणपत्र सादर न करणाºया सर्व शिक्षकांवर तात्काळ कारवाई करावी, याबरोबरच कारवाईस विलंब का झाला? याबाबतचा अहवालही सादर करण्याचे निर्देश दिले.या मुद्यावरही झाली शिक्षणसमितीच्या बैठकीत चर्चाशुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत प्रामुख्याने शाळा प्रवेशाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. अल्पसंख्याकांकडून चालविण्यात येणाºया धार्मिक, भाषिक अल्पसंख्याक शाळांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अनुदानित संस्थांनी मंजूर प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के (ब) तर विनाअनुदानित संस्थानच्या बाबतीत मंजूर प्रवेश क्षमतेच्या ५१ टक्के जागा या सर्वप्रथम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या भराव्यात.जिल्हा परिषदेच्या काही जागा नांदेड शहरात किरायाच्या जागेत आहेत. या शाळांचा किराया शासनाकडून वेळेवर मिळत नाही. या समस्येमुळे या शाळांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया तपासण्याचे निर्देश शिक्षण समितीने दिले. कमी पटसंख्या असलेल्या शाळा ग्रामीण भागात स्थलांतरित कराव्यात व मनपा हद्दीतील शाळा महापालिकेने चालवाव्यात, अशी सूचनाही करण्यात आली.बळीरामपूर येथील सरस्वती प्राथमिक शाळेला वेतन पथकाकडून चुकीचे देयक अदा झाले. या प्रकरणात तत्कालीन वेतनपथक अधीक्षक एम.एस. केंद्रे व लिपिक भुसलवाड यांच्याविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. ही फिर्याद नंतर मागे का घेण्यात आली? याबाबतचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.याबरोबरच शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयामध्ये संचिका वेळेवर निकाली लागत नाहीत. वरिष्ठांकडेही अनेक संचिका प्रलंबित आहेत. हा विलंब नेमका कशामुळे होतो? याबाबतही शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा झाली.अंमलबजावणीचे काय ?जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत समिती सदस्य शिक्षण विभागा संदर्भातील अनेक विषय पोटतिडकीने मांडतात. या बैठकीत समाजोपयोगी निर्णयही घेतले जातात. मात्र शिक्षण समितीने घेतलेल्या अनेक निर्णयांची शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर निर्णय चांगले आहेत. परंतु, त्याच्या अंमलबजावणीचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाने आता याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी