शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

३१ मार्चनंतर टंचाई निवारण प्रस्तावांना मान्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:30 IST

जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज असून पहिल्यांदाच फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणीटंचाई सोडवण्यासाठीच्या ६०० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मार्चअखेरनंतर टंचाई निवारणाचा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पाणीटंचाईचे प्रस्ताव जूनपर्यंत स्वीकारले जात होते, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांनी केले स्पष्ट : फेब्रुवारीअखेर ६०० प्रस्तावांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज असून पहिल्यांदाच फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणीटंचाई सोडवण्यासाठीच्या ६०० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मार्चअखेरनंतर टंचाई निवारणाचा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पाणीटंचाईचे प्रस्ताव जूनपर्यंत स्वीकारले जात होते, हे विशेष.जिल्ह्यात यंदा अपु-या पावसाने टंंचाईच्या झळा आतापासूनच जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी प्रशासन काळजी घेत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात नवीन विंधन विहिरी घेण्याचे २१३, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती २०१, विहिर अधिग्रहणाचे ८९, नळयोजना विशेष दुरुस्तीचे ६७, तात्पुरत्या पुरक नळयोजनेचे १९ प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी मंजूर केले आहेत. तसेच १२ टँकरने पाणीपुरवठाही करण्यात येत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांशवेळा एप्रिलनंतरच पाणी टंचाई निवारणाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत होते. प्रस्ताव मंजूर व्हायचे कधी अन् काम कधी करायचे? असा प्रश्न निर्माण होत असे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव जि.प.कडून मागविले होते. फेब्रुवारीअखेर प्रशासनाने तब्बल ६०० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. आता प्रत्यक्ष कामे करण्याची जबाबदारी जि.प.वर आहे. या कामाच्या अंमलबजावणीतून जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवली जाणार आहे.राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोगजिल्हाधिकारी डोंगरे यांनी पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याचा नवा प्रयोग जिल्ह्यात राबविला आहे. पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व स्वत: जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक घ्यायची. प्रस्तावातील तांत्रिक बाबींची तपासणी पूर्ण झाल्यानंतर जागेवरच प्रस्ताव मंजूर केला जात आहे. जिल्हाधिकारी डोंगरे यांनी राबविलेला हा प्रयोग राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे. त्यातून ग्रामीण भागातील जनतेची तहान वेळीच भागणार आहे.