शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चनंतर टंचाई निवारण प्रस्तावांना मान्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:30 IST

जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज असून पहिल्यांदाच फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणीटंचाई सोडवण्यासाठीच्या ६०० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मार्चअखेरनंतर टंचाई निवारणाचा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पाणीटंचाईचे प्रस्ताव जूनपर्यंत स्वीकारले जात होते, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांनी केले स्पष्ट : फेब्रुवारीअखेर ६०० प्रस्तावांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज असून पहिल्यांदाच फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणीटंचाई सोडवण्यासाठीच्या ६०० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मार्चअखेरनंतर टंचाई निवारणाचा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पाणीटंचाईचे प्रस्ताव जूनपर्यंत स्वीकारले जात होते, हे विशेष.जिल्ह्यात यंदा अपु-या पावसाने टंंचाईच्या झळा आतापासूनच जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी प्रशासन काळजी घेत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात नवीन विंधन विहिरी घेण्याचे २१३, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती २०१, विहिर अधिग्रहणाचे ८९, नळयोजना विशेष दुरुस्तीचे ६७, तात्पुरत्या पुरक नळयोजनेचे १९ प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी मंजूर केले आहेत. तसेच १२ टँकरने पाणीपुरवठाही करण्यात येत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांशवेळा एप्रिलनंतरच पाणी टंचाई निवारणाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत होते. प्रस्ताव मंजूर व्हायचे कधी अन् काम कधी करायचे? असा प्रश्न निर्माण होत असे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव जि.प.कडून मागविले होते. फेब्रुवारीअखेर प्रशासनाने तब्बल ६०० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. आता प्रत्यक्ष कामे करण्याची जबाबदारी जि.प.वर आहे. या कामाच्या अंमलबजावणीतून जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवली जाणार आहे.राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोगजिल्हाधिकारी डोंगरे यांनी पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याचा नवा प्रयोग जिल्ह्यात राबविला आहे. पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व स्वत: जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक घ्यायची. प्रस्तावातील तांत्रिक बाबींची तपासणी पूर्ण झाल्यानंतर जागेवरच प्रस्ताव मंजूर केला जात आहे. जिल्हाधिकारी डोंगरे यांनी राबविलेला हा प्रयोग राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे. त्यातून ग्रामीण भागातील जनतेची तहान वेळीच भागणार आहे.