शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे होणाऱ्या भरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:16 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे केंद्रीय मंत्रालयात सहाय्यक सचीवपदासाठी खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांची थेट नियुक्ती होणार आहे. सरकारचा हा निर्णय अजब असून संविधानाला डावलून घेण्यात आला आहे,खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या शासकीय क्षेत्रात नेमणूका करून सरकारी खाते सरळ खाजगी कंपन्याच्या घशात देण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडने धरणे आंदोलन केले. हा निर्णय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा करणारा असून लोकशाहीस मारक ठरणारा आहे. यामुळे हि भरती केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फतच करावी या व इतर मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

आंदोलनात संभाजी ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, दक्षिण जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, विभागिय कार्याध्यक्ष श्रीनिवास शेजुळे, भगवान कदम, संगम लांडगे, मोहन शिंदे,  संभाजी क्षीरसागर, मारोती देशमुख, दशरथ कदम, शशिकांत कलाने, शशिकांत गाढे,शाम पाटील, दीपक भरकड, गजानन इंगोले, कुंदन भोजने, आंकुश कोल्हे, आजय मुंगल, कमलेश कदम, विजय पौळ, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश पुयड, अशोक कदम, संतोष कदम विष्णु कोकाटे, आदिनाथ कदम आदिंचा सहभाग होता.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडStudentविद्यार्थीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड