शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:07 IST

दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़

ठळक मुद्देपित्याने केली होती आत्महत्या साईप्रसादच्या दात्यांनी दिले संसारोपयोगी साहित्य

नांदेड : दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़ भवर यांच्या मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी साईप्रसादच्या दात्यांनी घेतली असून लग्नासाठीचे सर्व साहित्य भवर कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे़ साईप्रसादच्या या दातृत्वाचे हट्टा गावात कौतुक होत आहे़वसमत तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी नानासाहेब भवर यांनी मुलगी मनीषा हिची सोयरीक जुळविली होती़ ७ मे लग्नाची तारीखही ठरली होती़ परंतु सोयरीक झाल्यानंतर मनीषाच्या विवाहासाठी लागणारा खर्च कसा करायचा, या विवंचनेत ते होते़ भवर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच़ २० गुंठे जमीन असून भवर कुटुंब रोजमजुरी करुनच आपला उदरनिर्वाह चालवितात़परंतु लग्नासाठीचा खर्च जुळविताना नानासाहेब भवर हतबल झाले होते़ त्याच विंवचनेत त्यांनी २८ एप्रिल रोजी आत्महत्या केली़ त्यामुळे अगोदरच संकटात असलेले भवर कुटुंब घरातील कर्तापुरुष गेल्याने अधिकच खचले होते़ भवर कुटुंबियावर कोसळलेल्या या संकटाची माहिती साईप्रसादच्या दात्यांना कळाली़त्यांनी लगेच भवर कुटुंबियांशी संपर्क साधून मनीषाच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी उचलणार असल्याचे कळविले़ त्यानंतर साईप्रसादच्या दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले़ आठ दिवसांतच मनीषाच्या लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य, वधू-वरांचे कपडे, मंगळसूत्र यासह संसारोपयोगी साहित्याचा साईप्रसादकडे ओघ सुरु झाला़ काही दिवसांत साईप्रसादकडे लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य जमा झाले होते़ शुक्रवारी साईप्रसादने हे सर्व साहित्य भवर कुटुंबियाकडे सुपूर्द केले़ साईप्रसादच्या या दातृत्वामुळे भवर कुटुंबियांनी आनंदाश्रू गाळत मनोमन आभार मानले़आत्महत्या करु नका, साईप्रसादशी संपर्क साधावडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींच्या विवाहासाठी संकटात असलेल्यांनी साईप्रसादशी संपर्क साधावा़ साईप्रसाद अशा मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार आहे़ तसेच विवाहाच्या चिंतेमुळे आत्महत्या करु नका असे आवाहनही साईप्रसादने केले आहे़आजपर्यंत साईप्रसादने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनेक मुलींचे विवाह लावून दिले आहेत़ त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच ६१ जोडप्यांचा विवाह सोहळाही घेण्यात आला होता़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक