शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:07 IST

दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़

ठळक मुद्देपित्याने केली होती आत्महत्या साईप्रसादच्या दात्यांनी दिले संसारोपयोगी साहित्य

नांदेड : दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़ भवर यांच्या मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी साईप्रसादच्या दात्यांनी घेतली असून लग्नासाठीचे सर्व साहित्य भवर कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे़ साईप्रसादच्या या दातृत्वाचे हट्टा गावात कौतुक होत आहे़वसमत तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी नानासाहेब भवर यांनी मुलगी मनीषा हिची सोयरीक जुळविली होती़ ७ मे लग्नाची तारीखही ठरली होती़ परंतु सोयरीक झाल्यानंतर मनीषाच्या विवाहासाठी लागणारा खर्च कसा करायचा, या विवंचनेत ते होते़ भवर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच़ २० गुंठे जमीन असून भवर कुटुंब रोजमजुरी करुनच आपला उदरनिर्वाह चालवितात़परंतु लग्नासाठीचा खर्च जुळविताना नानासाहेब भवर हतबल झाले होते़ त्याच विंवचनेत त्यांनी २८ एप्रिल रोजी आत्महत्या केली़ त्यामुळे अगोदरच संकटात असलेले भवर कुटुंब घरातील कर्तापुरुष गेल्याने अधिकच खचले होते़ भवर कुटुंबियावर कोसळलेल्या या संकटाची माहिती साईप्रसादच्या दात्यांना कळाली़त्यांनी लगेच भवर कुटुंबियांशी संपर्क साधून मनीषाच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी उचलणार असल्याचे कळविले़ त्यानंतर साईप्रसादच्या दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले़ आठ दिवसांतच मनीषाच्या लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य, वधू-वरांचे कपडे, मंगळसूत्र यासह संसारोपयोगी साहित्याचा साईप्रसादकडे ओघ सुरु झाला़ काही दिवसांत साईप्रसादकडे लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य जमा झाले होते़ शुक्रवारी साईप्रसादने हे सर्व साहित्य भवर कुटुंबियाकडे सुपूर्द केले़ साईप्रसादच्या या दातृत्वामुळे भवर कुटुंबियांनी आनंदाश्रू गाळत मनोमन आभार मानले़आत्महत्या करु नका, साईप्रसादशी संपर्क साधावडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींच्या विवाहासाठी संकटात असलेल्यांनी साईप्रसादशी संपर्क साधावा़ साईप्रसाद अशा मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार आहे़ तसेच विवाहाच्या चिंतेमुळे आत्महत्या करु नका असे आवाहनही साईप्रसादने केले आहे़आजपर्यंत साईप्रसादने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनेक मुलींचे विवाह लावून दिले आहेत़ त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच ६१ जोडप्यांचा विवाह सोहळाही घेण्यात आला होता़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक