शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मराठा मोर्चाच्या समन्वयकांची भूमिका संशयास्पद; उषा पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:08 IST

स्वयंघोषित समन्वयकांची भूमिका संशयास्पद वाटत असून समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग करून घेण्यासाठी राज्यभर संघटन उभे करणार

नांदेड : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे करताना सर्वात समोर असणाऱ्या महिलांना मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समितीमध्ये स्थान दिले नाही़ त्यामुळे या स्वयंघोषित समन्वयकांची भूमिका संशयास्पद वाटत असून समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग करून घेण्यासाठी राज्यभर संघटन उभे करणार असल्याची माहिती पुणे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष तथा महिला समन्वयक समितीच्या उषा पाटील इंगोले पत्रपरिषदेत दिली़ 

मराठा समाजाच्या हक्कासाठी आजपर्यंत ५८ मूकमोर्चे काढले़ त्यानंतर काही स्वयंघोषित समन्वयकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने उभी करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम केल्याचा आरोप इंगोले यांनी केला़ दरम्यान, वेगवेगळ्या प्रकारच्या समन्वय समित्या स्थापन करून त्यांनी राज्य शासनाशी वेळोवेळी बैठका, चर्चा केल्या़ परंतु, आजपर्यंत समाजाच्या २२ मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही़ मग समन्वयक शासनाकडे कोणत्या विषयाची चर्चा करीत आहेत, असा प्रन त्यांनी उपस्थित केला़ दरम्यान, पुणे येथे राज्यस्तरीय बैठक घेवून पुन्हा १७५ जणांची राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली़ परंतु, त्यात एकाही महिलेला स्थान दिले नाही़ सर्व आंदोलनात महिलांना पुढे करण्यात आले तर मग आज राज्यस्तरीय समन्वय समितीत महिलांना का डावलले? असा प्रश्न इंगोले यांनी उपस्थित केला़ काही समन्वयकांच्या दुकानदाऱ्या सुरू असून ते उजेडात येतील म्हणून महिलांना दूर ठेवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़ 

दरम्यान, मराठा महिला क्रांती मोर्चाची स्थापना करून त्यामध्ये समाजासाठी धडपडणाऱ्या महिलांचे संघटन उभे करणार असल्याचे उषा पाटील यांनी सांगितले़  यापुढे शासनासोबत कोणत्याही समन्वयकांना चर्चा करायची असेल तर त्यांना महिलांना सोबत घ्यावेच लागेल, अन्यथा आम्ही चर्चा होवू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला़ जलसमाधी, ठोकमोर्चा अथवा उग्र आंदोलनाची भूमिका घेणाऱ्यांचे जीव जात नाहीत, समन्वयक का आत्महत्या करीत नाहीत़ अशा लोकांच्या आवाहानास प्रतिसाद देवून काही समाजबांधव भावनिक होवून जीव देतात़ हे थांबायला हवे़ जीव दिल्याने प्रश्न सुटणार नसून समाजाच्या मागण्यांचा कृती आराखडा तयार करून त्याची पद्धतशीर मांडणी करणे, कायद्याच्या चौकटीत मागण्या बसविणे हाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले़ येणाऱ्या काळात समाजातील तज्ज्ञ, अभ्यासू मंडळींना सोबत घेवून मागण्यासंदर्भात लढा देणार असल्याचे इंगोले पाटील यांनी सांगितले़ यावेळी पत्रकार परिषदेला विद्या पाटील, रेवती पाटील, कदम यांची उपस्थिती होती़ 

वेळप्रसंगी पदाचा राजीनामाही देवूमाझ्यासाठी समाज मोठा आहे़ मी पदासाठी काम करीत नाही़ काही महिलांना मी जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष असल्याने समितीबाबत काही महिलांनी शंका निर्माण केली़ परंतु, वेळप्रसंगी मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही देईल़; पण ५० टक्के महिलांना राज्यस्तरीय समितीत सहभागी करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे उषा इंगोले पाटील यांनी स्पष्ट केले़ तसेच या महिलांच्या समितीत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, वकील, उद्योग आदी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणNandedनांदेड