शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

मराठा मोर्चाच्या समन्वयकांची भूमिका संशयास्पद; उषा पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:08 IST

स्वयंघोषित समन्वयकांची भूमिका संशयास्पद वाटत असून समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग करून घेण्यासाठी राज्यभर संघटन उभे करणार

नांदेड : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे करताना सर्वात समोर असणाऱ्या महिलांना मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समितीमध्ये स्थान दिले नाही़ त्यामुळे या स्वयंघोषित समन्वयकांची भूमिका संशयास्पद वाटत असून समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग करून घेण्यासाठी राज्यभर संघटन उभे करणार असल्याची माहिती पुणे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष तथा महिला समन्वयक समितीच्या उषा पाटील इंगोले पत्रपरिषदेत दिली़ 

मराठा समाजाच्या हक्कासाठी आजपर्यंत ५८ मूकमोर्चे काढले़ त्यानंतर काही स्वयंघोषित समन्वयकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने उभी करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम केल्याचा आरोप इंगोले यांनी केला़ दरम्यान, वेगवेगळ्या प्रकारच्या समन्वय समित्या स्थापन करून त्यांनी राज्य शासनाशी वेळोवेळी बैठका, चर्चा केल्या़ परंतु, आजपर्यंत समाजाच्या २२ मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही़ मग समन्वयक शासनाकडे कोणत्या विषयाची चर्चा करीत आहेत, असा प्रन त्यांनी उपस्थित केला़ दरम्यान, पुणे येथे राज्यस्तरीय बैठक घेवून पुन्हा १७५ जणांची राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली़ परंतु, त्यात एकाही महिलेला स्थान दिले नाही़ सर्व आंदोलनात महिलांना पुढे करण्यात आले तर मग आज राज्यस्तरीय समन्वय समितीत महिलांना का डावलले? असा प्रश्न इंगोले यांनी उपस्थित केला़ काही समन्वयकांच्या दुकानदाऱ्या सुरू असून ते उजेडात येतील म्हणून महिलांना दूर ठेवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़ 

दरम्यान, मराठा महिला क्रांती मोर्चाची स्थापना करून त्यामध्ये समाजासाठी धडपडणाऱ्या महिलांचे संघटन उभे करणार असल्याचे उषा पाटील यांनी सांगितले़  यापुढे शासनासोबत कोणत्याही समन्वयकांना चर्चा करायची असेल तर त्यांना महिलांना सोबत घ्यावेच लागेल, अन्यथा आम्ही चर्चा होवू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला़ जलसमाधी, ठोकमोर्चा अथवा उग्र आंदोलनाची भूमिका घेणाऱ्यांचे जीव जात नाहीत, समन्वयक का आत्महत्या करीत नाहीत़ अशा लोकांच्या आवाहानास प्रतिसाद देवून काही समाजबांधव भावनिक होवून जीव देतात़ हे थांबायला हवे़ जीव दिल्याने प्रश्न सुटणार नसून समाजाच्या मागण्यांचा कृती आराखडा तयार करून त्याची पद्धतशीर मांडणी करणे, कायद्याच्या चौकटीत मागण्या बसविणे हाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले़ येणाऱ्या काळात समाजातील तज्ज्ञ, अभ्यासू मंडळींना सोबत घेवून मागण्यासंदर्भात लढा देणार असल्याचे इंगोले पाटील यांनी सांगितले़ यावेळी पत्रकार परिषदेला विद्या पाटील, रेवती पाटील, कदम यांची उपस्थिती होती़ 

वेळप्रसंगी पदाचा राजीनामाही देवूमाझ्यासाठी समाज मोठा आहे़ मी पदासाठी काम करीत नाही़ काही महिलांना मी जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष असल्याने समितीबाबत काही महिलांनी शंका निर्माण केली़ परंतु, वेळप्रसंगी मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही देईल़; पण ५० टक्के महिलांना राज्यस्तरीय समितीत सहभागी करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे उषा इंगोले पाटील यांनी स्पष्ट केले़ तसेच या महिलांच्या समितीत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, वकील, उद्योग आदी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणNandedनांदेड