शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:37 IST

गेल्या दीड वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विविध ९७९ अपघातांच्या घटना घडल्या़ त्यामध्ये ४१५ हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला़ त्यात कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्याही मोठी आहे़ शनिवारी जांब परिसरात वºहाडाच्या टेम्पोला झालेला अपघात हा गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अपघातांपैकी एक होता़ या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ अपघातांच्या या दुष्टचक्रामुळे लग्नकार्यात मात्र विघ्न येत आहेत़

ठळक मुद्देदीड वर्षांत चारशेहून अधिक जणांना गमवावा लागला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अडीच वर्षांपूर्वी नांदेडनजीक मालेगावजवळ देवदर्शनासाठी जाणारी जीप, ट्रक आणि मिनीडोअरचा विचित्र अपघात झाला होता़ त्यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला होता़ दोन वर्र्षांपूर्वी विद्यापीठासमोर खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता़ सहा महिन्यांपूर्वी देगलूर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सवर ट्रक आदळला होता़ त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता़दरवर्षी लग्नसराईच्या काळात वºहाडींच्या वाहनांना होणाऱ्या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता़ या मालिकेत आता शनिवारी जांब येथे घडलेल्या भीषण अपघाताचा समावेश झाला आहे़ देशासह राज्यात घडणाºया अपघातांच्या घटनांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, अनेकवेळा रस्त्यांवरील वाहनांचा वेग यासह वाहनचालकांनी केलेल्या चुकांमुळे अपघाताला निमंत्रण मिळते़ जानेवारी २०१७ ते मार्च १८ या दीड वर्षांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या एकूण ९७२ घडल्या असून यामध्ये एकूण ३९१ जण दगावले आहेत. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात आतापर्यंत अपघातांच्या दहा घटना घडल्या असून मयतांची संख्या ४१५ पोहोचली आहे़ जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये ५५ अपघात झाले होते़ यामध्ये २५ जण दगावले. तर फेबु्रवारीमध्ये ४९ अपघातांत २०, मार्चमध्ये ७२ अपघात झाले. ज्यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. तसेच एप्रिल महिन्यातील ६५ अपघातांत ३०, मे महिन्यात ७५ अपघातांच्या घटनांत ३८, जून महिन्यात ७४ अपघात झाले. यात २७ जण दगावले. जुलै महिन्यात ७२ अपघात झाले. त्यात २० जण दगावले. तसेच आॅगस्ट महिन्यात ७१ अपघात झाले असून यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ६० अपघातांत २२ तर आॅक्टोबर महिन्यात २३ जण दगावले. नोव्हेंबर महिन्यात ६४ अपघातांत ३०, डिसेंबर महिन्यात ६७ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला. तर सन २०१८ मधील जानेवारी महिन्यातील ६४ अपघातांत २३, फेबु्रवारीमध्ये ५८ अपघातांत २१ तर मार्च महिन्यात ६६ अपघातांमध्ये २९ जण दगावले तर ५९७ जण गंभीर जखमी झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात अपघाताच्या दहांपेक्षा अधिक घटना घडल्या आहेत़उन्हाळ्यामुळे रक्ताचा तुटवडाउन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करणाºयांची संख्या रोडावली असून रक्ताचा तुटवडा भासत आहे़ परंतु, काही दिवसांपूर्वीच शासकीय रूग्णालयातील नर्सींग संघटना, नांदेड आणि वसमत येथे असे दोन रक्तदान शिबीर झाल्याने शासकीय रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध होता़ त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना आवश्यक असलेल्या एबी पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध होवू शकले़ दरम्यान, सध्या रक्तपेढीमध्ये निगेटीव्ह कोणतेही रक्त उपलब्ध नाही तर ओ + च्या २०, ए पॉझिटीव्ह आणि ओ पॉझिटीव्हच्या प्रत्येकी पाच बॅग उपलब्ध होत्या़ दररोज थॅलिसिमीया असलेल्या रूग्णांसाठी १२ ते १५ बॅग रक्त लागते़ एकंदरीत मागणी तेवढा रक्तसाठा नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनाच रक्त उपलब्ध करून देण्यासाठी धावपळ करावी लागते़ रक्ताचा तुटवडा आणि गरज लक्षात घेता रक्तदात्यांनी पुढे येवून रक्तदान करण्याची गरज आहे़ तसेच सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे़

जखमींमध्ये लहान मुलांसह नववधूचा समावेशअपघातात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांसह नववधूचा समावेश आहे़ ६ मे रोजी लग्न झालेल्या कोमल सोपान नारंगे सदर अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यास दुखापत झाली आहे़ त्यांच्या मनावर या घटनेचा मोठा आघात झाला असल्याचे त्यांच्या आईने सांगितले़ त्यांच्यासह १५ जणांवर नांदेडच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़

जखमींच्या मदतीसाठी नांदेडकरांची रुग्णालयात धावजवळपास सर्वच जखमी कुंभार समाजातील असून त्यांना भेटण्यासाठी कुंभार समाजातील नेत्यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेतली़ तसेच योग्य उपचार मिळतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ तर काहींच्या पुढाकारातून गंभीर जखमींना औरंगाबाद तसेच नांदेड येथील खासगी रूग्णालयात पाठविण्याचे प्रयत्न सुरू होते़ यावेळी अ‍ॅड़ संजय रूईकर, कांता चारी, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे, शंकरराव, कुंभार समाज संघटनेच्या कार्याध्यक्षा ललिता कुंभार आदींनी जखमींची विचारपूस केली़

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यूroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक