शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बीएसएनएलच्या संपाला नांदेडमध्ये प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:35 IST

बी.एस.एन.एल.ला ४-जी स्पेक्ट्रम वाटप करणे, १५ टक्के वाढीसह तिसऱ्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे, सेवानिवृत्त कर्मचा-यांना सुधारीत वेतनश्रेणी देणे, बी.एस.एन.एल.ला पूनर्जिवित करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी मागण्यांसाठी

नांदेड : बी.एस.एन.एल.ला ४-जी स्पेक्ट्रम वाटप करणे, १५ टक्के वाढीसह तिसऱ्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे, सेवानिवृत्त कर्मचा-यांना सुधारीत वेतनश्रेणी देणे, बी.एस.एन.एल.ला पूनर्जिवित करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी मागण्यांसाठी बी.एस.एन.एल.च्या आॅल युनियन अँड असोसिएशन कृती समितीच्या वतीने कर्मचारी आणि अधिका-यांनी संपाचे हत्यार उचलले असून ९० टक्के अधिकारी, कर्मचारी कामबंद संपात उतरले होते.१८ ते २० फेब्रुवारी या तीन दिवसांत बी.एस.एन.एल.च्या सर्व अधिकारी व कर्मचा?्यांच्या संघटनांनी देशव्यापी संप जाहीर केला होता़ नांदेड येथीलही अधिकारी, कर्मचारी संपात उतरले़ प्रारंभी पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली़ जम्मू-काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन या संपामध्ये जम्मू-काश्मीरच्या बी.एस.एन.एल.च्या अधिकारी व कर्मचा-यांना संपातून वगळण्याचा निर्णय कृती समितीने घेतला असल्याचे देवीदास फुलारी यांनी सांगितले़ हुतात्मा झालेल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर आॅल युनियन अँड असोसिएशनच्या वतीने आपली भूमिका मांडताना ए.डी. कुलकर्णी म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बी.एस.एन.एल.चे प्रचंड नुकसान झाले आहे. व्यवसायापेक्षा ग्राहकांना सेवा देणारी बी.एस.एन.एल. ही देशातील केवळ एकमात्र कंपनी आहे. पण सरकार प्रायव्हेट आॅपरेटरला प्राधान्य देऊन बी.एस.एन.एल.चे व कर्मचा-यांचे खच्चीकरण करण्याचे काम सध्याचे सरकार करीत आहे.यावेळी कृती समितीचे अध्यक्ष लालू कोंडलवाडे यांनी नांदेडच्या बी.एस.एन.एल. येथील अधिकारी आणि कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणावर संपाला प्रतिसाद दिल्याने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.यावेळी कृती समितीचे प्रामुख्याने तानाजी मळेवाले, शिवाजी झगडे, अशोक धुतराज, श्रीराम शिरसे, शिल्पा जावळे, श्याम जाधव, नर्मदाबाई कांबळे, बंडोपंत कुंटूरकर, आरती कुलकर्णी आणि राजेश्वर जोशीसह सर्व पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडStrikeसंपBSNLबीएसएनएलEmployeeकर्मचारी