शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

शेतकऱ्यांना दिलासा; अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या पंचवीस टक्के अधिक पिक विमा मिळणार

By प्रसाद आर्वीकर | Updated: September 29, 2023 14:02 IST

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना

नांदेड: अतिवृष्टीने जिल्ह्यात पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने विमा धारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के अधिक रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही अधिकची नुकसान भरपाई विमा कंपनीला द्यावी लागनार आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाच्या अनियमितणामुळे सोयाबिन, कापूस, तुर व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा वेळी विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी तात्काळ अधिसूचना काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  जिल्हा समितीमार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. समितीने केलेल्या सर्वेक्षणात सर्व तालुक्यात पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.

या अहवालानुसार जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्व तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम अदा करण्याचे निर्देश राऊत यांनी विमा कंपनीला दिले आहेत. या अधिसूचनेमुले शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या तुलनेत २५ टक्के अधिक रक्कम मिळणार आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत केले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी