शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शेतकऱ्यांना दिलासा; अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या पंचवीस टक्के अधिक पिक विमा मिळणार

By प्रसाद आर्वीकर | Updated: September 29, 2023 14:02 IST

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना

नांदेड: अतिवृष्टीने जिल्ह्यात पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने विमा धारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के अधिक रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही अधिकची नुकसान भरपाई विमा कंपनीला द्यावी लागनार आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाच्या अनियमितणामुळे सोयाबिन, कापूस, तुर व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा वेळी विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी तात्काळ अधिसूचना काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  जिल्हा समितीमार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. समितीने केलेल्या सर्वेक्षणात सर्व तालुक्यात पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.

या अहवालानुसार जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्व तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम अदा करण्याचे निर्देश राऊत यांनी विमा कंपनीला दिले आहेत. या अधिसूचनेमुले शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या तुलनेत २५ टक्के अधिक रक्कम मिळणार आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत केले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी