शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

नात्यांची वीण सैल होतेय, नांदेड जिल्ह्यात वर्षभरात साडेतीनशेंहून अधिक घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:50 IST

बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत.

नांदेड : सहजीवतील पती-पत्नीमधील हरवत चाललेला संवाद अन् मोबाइलच्या अतिरेकी वापर, त्यातून एकमेकांच्या मनात भटकणारे संशयाचे भूत आणि त्यातूनच सातजन्मासाठी बांधलेली गाठ सैल होत आहे. मागील वर्षाभरात नांदेड जिल्ह्यात साडेतीनशेंहून अधिक दाम्पत्यांनी घटस्फोट घेतले आहेत. कौटुंबिक न्यायालयात मागील पाच महिन्यात पावणेदोनशे प्रकरणे दाखल झाली आहेत.

अहिल्यानगर येथील वैष्णवी हगवणे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामुळे पती-पत्नीतील नातेसंबंध आणि कौटुंबिक हिंसाचारात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत. नांदेड जिल्हा कौटुंबिक न्यायालयात दि. १ जानेवारी २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३३१ प्रकरणे दाखल झाली तर १ जानेवारीपासून आजपर्यंत मागील पाच महिन्यात १६४ प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणे ही आपापसात समेट घडवून मिटविली जात असली तरी अनेक प्रकरणात वर्षानुवर्षे वाद सुरू असतात. त्यामध्ये मुलं कुणाकडे राहणार, पोटगी यासह विविध मागण्या आणि विषयावर वाद-विवाद सुरू असतात.

किरकोळ कारणावरून वादकौटुंबिक न्यायालयात दाखल प्रकरणांपैकी ७० ते ८० टक्के दाम्पत्यांचे घटस्फोट मंजूर होतात. त्यातील बहुतांश प्रकरणे ही आपसी तडजोडीच्या घटस्फोटाची आहेत. नोकरीनिमित्त एकमेकांपासून दूर राहणे, पतीपेक्षा पत्नीला अधिक पगार अथवा मोठी नोकरी असणे, स्वाभिमानीवृत्तीचा अतिरेकी आव, काही प्रकरणात तर मोबाइल, सोशल मीडिया व गॅलरी असलेले लॉकदेखील घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहेत, तर अनेक ठिकाणी लगेच अपत्य नको, एकच अपत्य हवे या विषयावरूनदेखील पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

घटस्फोटाची कारणं-संवादाचा अभाव की स्वाभिमानाची धुसफूस?या घटस्फोटांमागे अनेक कारणे समोर येतात. पती-पत्नीमधील संवादाचा अभाव, एकमेकांप्रती समजून घेण्याची कमी वृत्ती, मोबाइलच्या अतिरेकामुळे हरवलेली माणुसकीची नाळ, सासू-सासरे यांच्याशी होणारे वाद, एकत्र कुटुंब न आवडणं किंवा करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या नावे एकमेकांना वेळ न देणे आदी कारणे आहेत.

नाते टिकविणे गरजेचेघटस्फोटाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याच्या सामाजिक रचनेत पती-पत्नी दोघांनाही करिअर, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटतं. यातून संवाद कमी होतो आणि संशय वाढतो. घरगुती हिंसाचाराची केसेसही त्याचबरोबर वाढताना दिसत आहेत. अनेक वेळा स्त्रिया सहनशक्तीच्या पलीकडे जाऊनही गप्प बसतात, पण एक दिवस त्यांचा संयम तुटतो आणि तेव्हा या घटनांना वेगळे वळण लागते. कायदा महिलांच्या बाजूने आहे, पण त्याचा वापर सजगतेने आणि गरजेप्रमाणे व्हावा, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पती-पत्नीचे पवित्र नाते असून, ते टिकविणे गरजेचे आहे. कोर्टापेक्षा सामोपचाराने कुटुंबातच आपापसातील वाद मिटवून घ्यावेत.- ॲड. प्रसाद रानवळकर, वकील

म्युच्युअल घटस्फोटाचे प्रमाण अधिकन्यायालयात गेल्यानंतर लागणारा वेळ आणि समाजात होणारी बदनामी यातून अनेक दाम्पत्य कुटुंबांमध्येच म्युच्युअल घटस्फोट घेत असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारदेखील होत आहेत. परंतु, भविष्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने झालेले घटस्फोट दोघांसाठीही अडचणीचे ठरू शकतात.

टॅग्स :NandedनांदेडDivorceघटस्फोट