शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांची वीण सैल होतेय, नांदेड जिल्ह्यात वर्षभरात साडेतीनशेंहून अधिक घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:50 IST

बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत.

नांदेड : सहजीवतील पती-पत्नीमधील हरवत चाललेला संवाद अन् मोबाइलच्या अतिरेकी वापर, त्यातून एकमेकांच्या मनात भटकणारे संशयाचे भूत आणि त्यातूनच सातजन्मासाठी बांधलेली गाठ सैल होत आहे. मागील वर्षाभरात नांदेड जिल्ह्यात साडेतीनशेंहून अधिक दाम्पत्यांनी घटस्फोट घेतले आहेत. कौटुंबिक न्यायालयात मागील पाच महिन्यात पावणेदोनशे प्रकरणे दाखल झाली आहेत.

अहिल्यानगर येथील वैष्णवी हगवणे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामुळे पती-पत्नीतील नातेसंबंध आणि कौटुंबिक हिंसाचारात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत. नांदेड जिल्हा कौटुंबिक न्यायालयात दि. १ जानेवारी २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३३१ प्रकरणे दाखल झाली तर १ जानेवारीपासून आजपर्यंत मागील पाच महिन्यात १६४ प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणे ही आपापसात समेट घडवून मिटविली जात असली तरी अनेक प्रकरणात वर्षानुवर्षे वाद सुरू असतात. त्यामध्ये मुलं कुणाकडे राहणार, पोटगी यासह विविध मागण्या आणि विषयावर वाद-विवाद सुरू असतात.

किरकोळ कारणावरून वादकौटुंबिक न्यायालयात दाखल प्रकरणांपैकी ७० ते ८० टक्के दाम्पत्यांचे घटस्फोट मंजूर होतात. त्यातील बहुतांश प्रकरणे ही आपसी तडजोडीच्या घटस्फोटाची आहेत. नोकरीनिमित्त एकमेकांपासून दूर राहणे, पतीपेक्षा पत्नीला अधिक पगार अथवा मोठी नोकरी असणे, स्वाभिमानीवृत्तीचा अतिरेकी आव, काही प्रकरणात तर मोबाइल, सोशल मीडिया व गॅलरी असलेले लॉकदेखील घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहेत, तर अनेक ठिकाणी लगेच अपत्य नको, एकच अपत्य हवे या विषयावरूनदेखील पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

घटस्फोटाची कारणं-संवादाचा अभाव की स्वाभिमानाची धुसफूस?या घटस्फोटांमागे अनेक कारणे समोर येतात. पती-पत्नीमधील संवादाचा अभाव, एकमेकांप्रती समजून घेण्याची कमी वृत्ती, मोबाइलच्या अतिरेकामुळे हरवलेली माणुसकीची नाळ, सासू-सासरे यांच्याशी होणारे वाद, एकत्र कुटुंब न आवडणं किंवा करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या नावे एकमेकांना वेळ न देणे आदी कारणे आहेत.

नाते टिकविणे गरजेचेघटस्फोटाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याच्या सामाजिक रचनेत पती-पत्नी दोघांनाही करिअर, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटतं. यातून संवाद कमी होतो आणि संशय वाढतो. घरगुती हिंसाचाराची केसेसही त्याचबरोबर वाढताना दिसत आहेत. अनेक वेळा स्त्रिया सहनशक्तीच्या पलीकडे जाऊनही गप्प बसतात, पण एक दिवस त्यांचा संयम तुटतो आणि तेव्हा या घटनांना वेगळे वळण लागते. कायदा महिलांच्या बाजूने आहे, पण त्याचा वापर सजगतेने आणि गरजेप्रमाणे व्हावा, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पती-पत्नीचे पवित्र नाते असून, ते टिकविणे गरजेचे आहे. कोर्टापेक्षा सामोपचाराने कुटुंबातच आपापसातील वाद मिटवून घ्यावेत.- ॲड. प्रसाद रानवळकर, वकील

म्युच्युअल घटस्फोटाचे प्रमाण अधिकन्यायालयात गेल्यानंतर लागणारा वेळ आणि समाजात होणारी बदनामी यातून अनेक दाम्पत्य कुटुंबांमध्येच म्युच्युअल घटस्फोट घेत असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारदेखील होत आहेत. परंतु, भविष्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने झालेले घटस्फोट दोघांसाठीही अडचणीचे ठरू शकतात.

टॅग्स :NandedनांदेडDivorceघटस्फोट