शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महसूल-कृषीच्या वादात २२२ काेटींची वसुली थांबली; पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 16:49 IST

PM Kisan Yojana Recovery : काम महसूल विभागाने करायचे आणि पुरस्कार कृषी विभागाने घ्यायचा, या मुद्द्यावरून या दाेन्ही विभागांमध्ये आठ महिन्यांपूर्वी वाद सुरू झाला.

- राजेश निस्ताने

नांदेड : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान याेजनेत (पीएम-किसान) राज्यात ( PM Kisan Yojana ) प्राप्तीकर भरणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांनीही अनुदानाची रक्कम उचलली. याशिवाय अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यांच्याकडून २२२ काेटी रूपये वसूल करण्याचे उद्दिष्ट (Recovery of 222 Cr in PM Kisan Yojana stopped ) आहे. परंतु, याेजनेचे काम कृषी विभागाने करायचे की महसूल विभागाने याचा निर्णय अद्याप शासनाने न दिल्याने गेल्या आठ महिन्यांपासून २२२ काेटींची ही वसुली थंडबस्त्यात पडली आहे.

सन २०१९ला पंतप्रधान शेतकरी सन्मान याेजनेची घाेषणा करण्यात आली. त्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ४ महिन्यातून एकदा २ हजारांचे अनुदान दिले जाते. अर्थात वर्षाला ६ हजार रूपये अनुदान देण्यात येते. १४ जून २०२१पर्यंत १२ हजार ८२३ काेटी ८८ लाख रूपयांची रक्कम बॅंकांना दिली गेली. परंतु, प्राप्तीकर भरणारे, सरकारी नाेकर, राजकीय पदाधिकारी, पात्र नसलेल्या शेतकऱ्यांनीही या अनुदानाचा लाभ घेतल्याचे प्राप्तीकर विभागाच्या तपासणीत आढळून आले. राज्यात अशा केवळ प्राप्तीकर भरूनही अनुदान घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा २ लाख ६२ हजार ९१३ एवढा आहे. त्यांच्याकडून एकूण २२२ काेटी १८ लाख ३८ हजार एवढी रक्कम वसूल करायची आहे. याशिवाय इतर कारणांनी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा हजाराेंच्या आणि रक्कम काेट्यवधींच्या घरात आहे. परंतु, ही वसुली वांद्यात आहे.

पीएम-किसान याेजनेला सुरूवातीच्या काही महिन्यांतच ग्रहण लागले. काम महसूल विभागाने करायचे आणि पुरस्कार कृषी विभागाने घ्यायचा, या मुद्द्यावरून या दाेन्ही विभागांमध्ये आठ महिन्यांपूर्वी वाद सुरू झाला. दिल्लीतील पुरस्कार वितरण साेहळ्याला महसूल खात्याच्या एकाही अधिकाऱ्याला निमंत्रित केले गेले नाही, यावरून या वादाची ठिणगी पडली. तेव्हापासून महसूल विभागातील यंत्रणेने पीएम-किसानच्या या कामावर बहिष्कार घातला आहे. पीएम-किसानचे काम नेमके कुणी करायचे, हे सरकारने सांगावे यासंबंधीचा प्रस्ताव आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पाठवला गेला. मात्र, त्यावर अद्याप ताेडगा निघाला नाही. पर्यायाने २२२ काेटींच्या वसुलीचे काम ठप्प झाले आहे. शासनाने अनुदानाची रक्कम आधीच बॅंकांकडे वळती केली असल्याने पात्र लाभार्थ्यांना मात्र प्रत्येक चार महिन्यांनी आपला २ हजारांच्या अनुदानाचा वाटा नियमित मिळताे आहे.

सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातवसूल करावयाच्या २२२ काेटींपैकी सर्वाधिक रक्कम पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे आहे. सातारा १८ काेटी, पुणे १६ काेटी, साेलापूर १४ काेटी, काेल्हापूर १४ काेटी, जळगाव १३ काेटी, नाशिक १२ काेटी, नगर ११ काेटी या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे.

विदर्भ-मराठवाड्यातही वसुलीची प्रतीक्षामराठवाडा, विदर्भातही माेठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांनी अनुदान लाटले. त्यांच्याकडील वसुली बाकी आहे. त्यात अकाेला ४ काेटी, अमरावती ५ काेटी, औरंगाबाद ७ काेटी, बीड ७ काेटी, भंडारा २ काेटी, बुलडाणा ५ काेटी, चंद्रपूर ३ काेटी, धुळे ४ काेटी, गडचिराेली ७७ लाख, गाेंदिया २ काेटी, हिंगाेली २ काेटी, जालना ५ काेटी, लातूर ८ काेटी , नागपूर ४ काेटी, नांदेड ६ काेटी, नंदुरबार १ काेटी, उस्मानाबाद ७ काेटी, पालघर १ काेटी, परभणी ४ काेटी, रायगड ३ काेटी, रत्नागिरी २ काेटी, सांगली १२ काेटी, सिंधुदुर्ग २ काेटी, ठाणे २ काेटी, वर्धा ३ काेटी, वाशिम ३ काेटी आणि यवतमाळ जिल्ह्यातील १ काेटी थकबाकी वसुली प्रलंबित आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNandedनांदेडMONEYपैसाagricultureशेती