शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात पावसाची दमदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:38 IST

जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर इतर तालुक्यातही पावसाचा चांगलाच जोर होता.

ठळक मुद्देतीन तालुक्यांत अतिवृष्टी : जनजीवन झाले विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर इतर तालुक्यातही पावसाचा चांगलाच जोर होता. हिमायतनगर तालुक्यात जोराच्या पावसामुळे ४५ मेंढ्या गुदमरुन दगावल्या तर तालुक्यातील पोटा येथील पूल वाहून गेला. त्यामुळे भोकर-किनवट वाहतूक सुमारे वाहतूक पाच तास ठप्प होती. नांदेड शहरातही चांगला पाऊस झाला.भोकर तालुक्यात १०५ मि.मी. पाऊसभोकर - तालुक्यात सतत दोन दिवसापासून रात्रीला होत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असले तरी मानसूनपूर्व वादळी वारे व मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड होवून विद्युत खांब व झाडे आडवी पडून नुकसान होत आहे. यातचतालुक्यात मंडळनिहाय मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे प्रमाण पुढील प्रमाणे, कंसात आतापर्यंत झालेला पाऊस- भोकर - ४० (४४) मि.मी. मोघाळी - ६५ (१८१) मि.मी., मातुळ - ०० (२०) मि.मी., किनी - ०० (३४)मि.मी. अशा प्रकारे तालुक्यात एकूण १०५ (३१९) मि.मी. तर मंगळवारी रात्री सरासरी पाऊस - २६.२५ मि.मी. होवून आतापर्यंत सरासरी ७९.७५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अतीवृष्टी झालेल्या मोघाळी मंडळातील मोघाळी, धारजणी शिवारात बुधवारी शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरवात केली आहे.

---हिमायतनगरमध्ये जनजीवन विस्कळीतहिमायतनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती़ शहरातील ४५ मेंढ्या तर एका मिस्त्रीची सेंट्रिंग वाहून गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला़ दोन तासात सगळीकडे पाणीच पाणी झाले़ नदी-नाले भरभरून वाहू लागले़ अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे़ यावेळी एकच तारांबळ उडाली़ त्यामध्ये घरातील साहित्य कडधान्ये भिजल्यावर मोठे नुकसान झाले़ तसेच रेल्वेस्थानक रस्त्यालगत पुराचे पाणी साचल्यामुळे मेंढ्यांचा व्यवसाय करणाºया म. समीर आणि अ. बशीर यांच्या जवळपास ४५ मेंढ्या गुदमरुन दगावल्या आहेत. हिमायतनगर शहरातील अनेक वार्डातील घरामध्ये पावसाचे पाणी गेले होते़ नगराध्यक्षांच्या वार्ड क्र. ३ मध्ये अनेक नागरिकांच्या घरात नालीचे घाण पाणी गेल्याने घरातील साहित्य व कडधान्ये भिजले तर शेख हसन यांच्या घरातील साखरेचे पोते, खताचे पोते भिजून मोठे नुकसान झाले आहे़ भटक्यांनी लावलेल्या राहुट्या वाहुन गेल्या होत्या़ बचावासाठी मुलाबाळांसह डांबरी रस्त्यावर घेऊन थांबावे लागले येथील मिस्त्री युनूस मिस्त्री यांची १.५ लाखाची लाकडे (सेंट्रिंग) वाहून गेली वडगाव येथील शेतकरी भीमराव पाटील यांच्या शेतातील दोन एकरमधील हळद लावलेली मातीसह खरडून गेली आहे़ टाकराळा येथील लाव्हाळे यांची दहा एकर शेती खरडून गेल्याने जमीन नापीक झाली़ नदी नाल्या शेजारील अनेक शेतकºयांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत़ हिमायतनगर शहरात ११४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सरसम बु.७० मिलीमिटर, जवळगाव ९५ मिलीमीटर एकूण १५९.४ मिलीमीटर पाऊस झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आली आहे.---धानोºयात घर कोसळले, कुटुंबिय थोडक्यात बचावलेभोकर $: तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवित हानी टळली. तर दुसºया घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकºयाचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री ८.३० वाजता धानोरा येथील पांडुरंग ग्यानोबा कुरुकवाड यांचे कौलारु घर कोसळले. यावेळी विद्यूत पुरवठा खंडित झाल्यामुळे कुरुकवाड कुटुंबातील पती, पत्नी, वडील व ६ वषार्चा मुलगा ओसरीत झोपलेले असल्यामुळे जीवित हानी टळली. तर भगवान धगरे यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम ढासळले.---रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य ; अनेक मार्गांवरील वाहतूक वळविलीहदगाव तालुक्यातील पोटा येथील पुलाखालचे बेडच खरडून गेले तर तात्पुरता बनवलेला रस्ता सर्वच वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे आणि पारवा येथील वाहतुकीसाठी बनवलेला पूल पुराच्या पाण्याने जमिनीतून खरडून गेला या दोन्ही पुलांनी गुत्तेदाराची निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली असृन वाहतूक ठप्प झाली आहे हिमायतनगर ते इस्लापूर महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने वाहने घसरत होती दोन चाकी वाहनाच्या चाकाच्या मडगाडात चिखल अडकून बसत असल्याने दुचाकीस्वारांची दमछाक होत होती. किनवट मार्गे नांदेड कडे जाणारी वाहतूक सोनारी फाटा येथून हदगाव मार्गे नांदेड कडे वळवली आहे. नांदेड किनवट मार्गे येणारी वाहतूक हदगाव मार्गे किनवट जात आहे. सदरील पुलाखालील जमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन दिवस तरी लागतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसWaterपाणी