शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नांदेड जिल्ह्यात पावसाची दमदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:38 IST

जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर इतर तालुक्यातही पावसाचा चांगलाच जोर होता.

ठळक मुद्देतीन तालुक्यांत अतिवृष्टी : जनजीवन झाले विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर इतर तालुक्यातही पावसाचा चांगलाच जोर होता. हिमायतनगर तालुक्यात जोराच्या पावसामुळे ४५ मेंढ्या गुदमरुन दगावल्या तर तालुक्यातील पोटा येथील पूल वाहून गेला. त्यामुळे भोकर-किनवट वाहतूक सुमारे वाहतूक पाच तास ठप्प होती. नांदेड शहरातही चांगला पाऊस झाला.भोकर तालुक्यात १०५ मि.मी. पाऊसभोकर - तालुक्यात सतत दोन दिवसापासून रात्रीला होत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असले तरी मानसूनपूर्व वादळी वारे व मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड होवून विद्युत खांब व झाडे आडवी पडून नुकसान होत आहे. यातचतालुक्यात मंडळनिहाय मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे प्रमाण पुढील प्रमाणे, कंसात आतापर्यंत झालेला पाऊस- भोकर - ४० (४४) मि.मी. मोघाळी - ६५ (१८१) मि.मी., मातुळ - ०० (२०) मि.मी., किनी - ०० (३४)मि.मी. अशा प्रकारे तालुक्यात एकूण १०५ (३१९) मि.मी. तर मंगळवारी रात्री सरासरी पाऊस - २६.२५ मि.मी. होवून आतापर्यंत सरासरी ७९.७५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अतीवृष्टी झालेल्या मोघाळी मंडळातील मोघाळी, धारजणी शिवारात बुधवारी शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरवात केली आहे.

---हिमायतनगरमध्ये जनजीवन विस्कळीतहिमायतनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती़ शहरातील ४५ मेंढ्या तर एका मिस्त्रीची सेंट्रिंग वाहून गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला़ दोन तासात सगळीकडे पाणीच पाणी झाले़ नदी-नाले भरभरून वाहू लागले़ अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे़ यावेळी एकच तारांबळ उडाली़ त्यामध्ये घरातील साहित्य कडधान्ये भिजल्यावर मोठे नुकसान झाले़ तसेच रेल्वेस्थानक रस्त्यालगत पुराचे पाणी साचल्यामुळे मेंढ्यांचा व्यवसाय करणाºया म. समीर आणि अ. बशीर यांच्या जवळपास ४५ मेंढ्या गुदमरुन दगावल्या आहेत. हिमायतनगर शहरातील अनेक वार्डातील घरामध्ये पावसाचे पाणी गेले होते़ नगराध्यक्षांच्या वार्ड क्र. ३ मध्ये अनेक नागरिकांच्या घरात नालीचे घाण पाणी गेल्याने घरातील साहित्य व कडधान्ये भिजले तर शेख हसन यांच्या घरातील साखरेचे पोते, खताचे पोते भिजून मोठे नुकसान झाले आहे़ भटक्यांनी लावलेल्या राहुट्या वाहुन गेल्या होत्या़ बचावासाठी मुलाबाळांसह डांबरी रस्त्यावर घेऊन थांबावे लागले येथील मिस्त्री युनूस मिस्त्री यांची १.५ लाखाची लाकडे (सेंट्रिंग) वाहून गेली वडगाव येथील शेतकरी भीमराव पाटील यांच्या शेतातील दोन एकरमधील हळद लावलेली मातीसह खरडून गेली आहे़ टाकराळा येथील लाव्हाळे यांची दहा एकर शेती खरडून गेल्याने जमीन नापीक झाली़ नदी नाल्या शेजारील अनेक शेतकºयांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत़ हिमायतनगर शहरात ११४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सरसम बु.७० मिलीमिटर, जवळगाव ९५ मिलीमीटर एकूण १५९.४ मिलीमीटर पाऊस झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आली आहे.---धानोºयात घर कोसळले, कुटुंबिय थोडक्यात बचावलेभोकर $: तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवित हानी टळली. तर दुसºया घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकºयाचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री ८.३० वाजता धानोरा येथील पांडुरंग ग्यानोबा कुरुकवाड यांचे कौलारु घर कोसळले. यावेळी विद्यूत पुरवठा खंडित झाल्यामुळे कुरुकवाड कुटुंबातील पती, पत्नी, वडील व ६ वषार्चा मुलगा ओसरीत झोपलेले असल्यामुळे जीवित हानी टळली. तर भगवान धगरे यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम ढासळले.---रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य ; अनेक मार्गांवरील वाहतूक वळविलीहदगाव तालुक्यातील पोटा येथील पुलाखालचे बेडच खरडून गेले तर तात्पुरता बनवलेला रस्ता सर्वच वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे आणि पारवा येथील वाहतुकीसाठी बनवलेला पूल पुराच्या पाण्याने जमिनीतून खरडून गेला या दोन्ही पुलांनी गुत्तेदाराची निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली असृन वाहतूक ठप्प झाली आहे हिमायतनगर ते इस्लापूर महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने वाहने घसरत होती दोन चाकी वाहनाच्या चाकाच्या मडगाडात चिखल अडकून बसत असल्याने दुचाकीस्वारांची दमछाक होत होती. किनवट मार्गे नांदेड कडे जाणारी वाहतूक सोनारी फाटा येथून हदगाव मार्गे नांदेड कडे वळवली आहे. नांदेड किनवट मार्गे येणारी वाहतूक हदगाव मार्गे किनवट जात आहे. सदरील पुलाखालील जमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन दिवस तरी लागतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसWaterपाणी