शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पर्जन्यमापकांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:10 IST

पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपथकाची स्थापना पावसाची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी प्रशासनाची खबरदारी

अनुराग पोवळे ।नांदेड : पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. यासाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महसूल मंडळात असलेले सर्व पर्जन्यमापक यंत्र जागतिक हवामान निकषाप्रमाणे आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. जी यंत्रे सुुस्थितीत अथवा नादुरुस्त आहेत ती दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गठीत करण्यात आले आहे.या पथकाकडून पर्जन्यमापक यंत्राची देखभाल, पावसाची मोजमाप, त्याची योग्य पद्धत, संभाव्य चुका आदींबाबतची माहिती संबंधित पर्जन्य मोजणा-या कर्मचा-याला देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. भारतीय हवामान खात्याचे मॅट्रॉलॉजिस्ट ए.एम. पांडे, नांदेडचे हवामान निरीक्षक बी.एम. कच्छवे यांचा या पथकात समावेश आहे. या पथकाला मोजणीसाठी वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार मुखेड तालुक्यातील महसूल मंडळातील पर्जन्यमापकाची २७ मे रोजी तपासणी केली जाणार आहे. तर बिलोली व धर्माबाद तालुक्यात २८ मे, नांदेड व मुदखेड तालुक्यात २९ मे, नायगाव व देगलूर तालुक्यात ३० मे, हदगाव व माहूर तालुक्यात ३१ मे, किनवट तालुक्यात १ जून, हिमायतनगर व उमरी तालुक्यात ३ जून, अर्धापूर आणि भोकर तालुक्यात ४ जून आणि सर्वात शेवटी लोहा व कंधार तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्राची तपासणी ५ जून रोजी केली जाणार आहे. भारतीय हवामान विभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकात अव्वल कारकून सुरेश पेदेवाड, लिपिक शंकर मगडेवार आणि विजय येमेकर यांचाही समावेश आहे.या तपासणी पथकाला तालुक्यांमध्ये सर्व पर्जन्यमापक यंत्र दाखवावेत. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. या तपासणीचा अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.चुकीच्या नोंदी होत असल्याच्या तक्रारी वाढल्यापर्जन्यमापकावरील चुकीच्या नोंदीमुळे अनेक ठिकाणी तक्रारी होत आहेत. पावसाच्या चुकीच्या नोंदी घेतल्या जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक भागात प्रशासकीय अधिका-यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत तर हा विषय ऐरणीवर येत असतो. परिणामी प्रारंभीपासूनच या विषयात लक्ष घालणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पावसाळ्यापूर्वीच ही तपासणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही पावसाची नोंद घेणारे पर्जन्यमापक यंत्र महत्त्वाचे असल्याने या यंत्राची तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडweatherहवामानRainपाऊस