शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पर्जन्यमापकांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:10 IST

पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपथकाची स्थापना पावसाची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी प्रशासनाची खबरदारी

अनुराग पोवळे ।नांदेड : पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. यासाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महसूल मंडळात असलेले सर्व पर्जन्यमापक यंत्र जागतिक हवामान निकषाप्रमाणे आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. जी यंत्रे सुुस्थितीत अथवा नादुरुस्त आहेत ती दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गठीत करण्यात आले आहे.या पथकाकडून पर्जन्यमापक यंत्राची देखभाल, पावसाची मोजमाप, त्याची योग्य पद्धत, संभाव्य चुका आदींबाबतची माहिती संबंधित पर्जन्य मोजणा-या कर्मचा-याला देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. भारतीय हवामान खात्याचे मॅट्रॉलॉजिस्ट ए.एम. पांडे, नांदेडचे हवामान निरीक्षक बी.एम. कच्छवे यांचा या पथकात समावेश आहे. या पथकाला मोजणीसाठी वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार मुखेड तालुक्यातील महसूल मंडळातील पर्जन्यमापकाची २७ मे रोजी तपासणी केली जाणार आहे. तर बिलोली व धर्माबाद तालुक्यात २८ मे, नांदेड व मुदखेड तालुक्यात २९ मे, नायगाव व देगलूर तालुक्यात ३० मे, हदगाव व माहूर तालुक्यात ३१ मे, किनवट तालुक्यात १ जून, हिमायतनगर व उमरी तालुक्यात ३ जून, अर्धापूर आणि भोकर तालुक्यात ४ जून आणि सर्वात शेवटी लोहा व कंधार तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्राची तपासणी ५ जून रोजी केली जाणार आहे. भारतीय हवामान विभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकात अव्वल कारकून सुरेश पेदेवाड, लिपिक शंकर मगडेवार आणि विजय येमेकर यांचाही समावेश आहे.या तपासणी पथकाला तालुक्यांमध्ये सर्व पर्जन्यमापक यंत्र दाखवावेत. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. या तपासणीचा अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.चुकीच्या नोंदी होत असल्याच्या तक्रारी वाढल्यापर्जन्यमापकावरील चुकीच्या नोंदीमुळे अनेक ठिकाणी तक्रारी होत आहेत. पावसाच्या चुकीच्या नोंदी घेतल्या जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक भागात प्रशासकीय अधिका-यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत तर हा विषय ऐरणीवर येत असतो. परिणामी प्रारंभीपासूनच या विषयात लक्ष घालणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पावसाळ्यापूर्वीच ही तपासणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही पावसाची नोंद घेणारे पर्जन्यमापक यंत्र महत्त्वाचे असल्याने या यंत्राची तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडweatherहवामानRainपाऊस