शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील १२१ गावांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:18 IST

राज्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेवून श्रमदान केले पाहिजे. या कार्यात पाणी फाऊंडेशन मदत करीत असून यामध्ये नागरिकांना योगदान करण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेवून श्रमदान केले पाहिजे. या कार्यात पाणी फाऊंडेशन मदत करीत असून यामध्ये नागरिकांना योगदान करण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले आहे.शहरातील कलामंदिर परिसरात पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, पाणी फाऊंडेशन व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेला राज्यातील अनेक गावांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्यातील तीन तालुक्यांतील ११६ गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये सातारा जिल्ह्यातील वेळू या गावाने स्पर्धेत बाजी मारली. त्यानंतर २०१७ मध्ये राज्यातील ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये झालेल्या स्पर्धेत काकडदरा हे गाव विजेता ठरले. त्यानंतर आता यावर्षी राज्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार ३२ गावांमध्ये ही स्पर्धा घेतली जात असल्याची माहिती डॉ़ अविनाश पोळ यांनी दिली.यावर्षी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ५३ तर लोहा तालुक्यातील ६८ गावे अशा एकूण १२१ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठविले असून या गावांतील जलसंकट दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.दरम्यान, स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ५० लाख, तर तिसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.यावेळी मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिंगारे, भोकर तालुका समन्वयक अमोल माने व लोहा तालुका समन्वयक सुगंध पळसे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणी