शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील १२१ गावांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:18 IST

राज्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेवून श्रमदान केले पाहिजे. या कार्यात पाणी फाऊंडेशन मदत करीत असून यामध्ये नागरिकांना योगदान करण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेवून श्रमदान केले पाहिजे. या कार्यात पाणी फाऊंडेशन मदत करीत असून यामध्ये नागरिकांना योगदान करण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले आहे.शहरातील कलामंदिर परिसरात पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, पाणी फाऊंडेशन व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेला राज्यातील अनेक गावांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्यातील तीन तालुक्यांतील ११६ गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये सातारा जिल्ह्यातील वेळू या गावाने स्पर्धेत बाजी मारली. त्यानंतर २०१७ मध्ये राज्यातील ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये झालेल्या स्पर्धेत काकडदरा हे गाव विजेता ठरले. त्यानंतर आता यावर्षी राज्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार ३२ गावांमध्ये ही स्पर्धा घेतली जात असल्याची माहिती डॉ़ अविनाश पोळ यांनी दिली.यावर्षी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ५३ तर लोहा तालुक्यातील ६८ गावे अशा एकूण १२१ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठविले असून या गावांतील जलसंकट दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.दरम्यान, स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ५० लाख, तर तिसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.यावेळी मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिंगारे, भोकर तालुका समन्वयक अमोल माने व लोहा तालुका समन्वयक सुगंध पळसे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणी