शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील १२१ गावांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:18 IST

राज्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेवून श्रमदान केले पाहिजे. या कार्यात पाणी फाऊंडेशन मदत करीत असून यामध्ये नागरिकांना योगदान करण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेवून श्रमदान केले पाहिजे. या कार्यात पाणी फाऊंडेशन मदत करीत असून यामध्ये नागरिकांना योगदान करण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले आहे.शहरातील कलामंदिर परिसरात पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, पाणी फाऊंडेशन व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेला राज्यातील अनेक गावांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्यातील तीन तालुक्यांतील ११६ गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये सातारा जिल्ह्यातील वेळू या गावाने स्पर्धेत बाजी मारली. त्यानंतर २०१७ मध्ये राज्यातील ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये झालेल्या स्पर्धेत काकडदरा हे गाव विजेता ठरले. त्यानंतर आता यावर्षी राज्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार ३२ गावांमध्ये ही स्पर्धा घेतली जात असल्याची माहिती डॉ़ अविनाश पोळ यांनी दिली.यावर्षी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ५३ तर लोहा तालुक्यातील ६८ गावे अशा एकूण १२१ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठविले असून या गावांतील जलसंकट दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.दरम्यान, स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ५० लाख, तर तिसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.यावेळी मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिंगारे, भोकर तालुका समन्वयक अमोल माने व लोहा तालुका समन्वयक सुगंध पळसे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणी