शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठी खासगी रेल्वे औरंगाबादऐवजी नांदेडातून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 19:26 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सिंघ यांनी शुक्रवारी दुपारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचे काम सर्व स्तरावर सुरू रेल्वे पटरीच्या तांत्रिक कामाबरोबरच रखडलेल्या कामांना वेग दिला आहे.

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत, त्यामुळे रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. परंतु ते भरून काढण्यासाठी यापुढे मालवाहतूक वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचे काम सर्व स्तरावर सुरू आहे तर मुंबईसाठी औरंगाबादऐवजीनांदेड येथून खासगी रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दक्षिण मध रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपींदर सिंघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सिंघ यांनी शुक्रवारी दुपारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन काळात रेल्वे अधिकारी, आरपीएफ, कर्मचारी आणि कुटुंबानी धान्य किट तयार करून त्या कामगार, मजूर आणि गरजूंना वाटप केल्याचे सांगितले. तसेच 12 हजार वॉशेबल मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले. लॉकडाऊन काळात विभागाला जवळपास दीडशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मार्च ते ऑगस्टदरम्यान जवळपास सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यापुढेही किती दिवस रेल्वे सेवा बंद राहील हे सांगता येणे शक्‍य नाही. या कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांसाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. रेल्वे पटरीच्या तांत्रिक कामाबरोबरच रखडलेल्या कामांना वेग दिला आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेचे घटलेले उत्पन्न भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त मालगाड्या चालविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पथकांच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा करण्यात आली आहे. लवकरच नांदेड विभागातून कापूस, हळद, तूर व इतर धान्य परराज्यात पाठविण्यात येणार आहे. 

अकोला येथील गुडशेड 1 ऑगस्ट पासून बंद करण्यात आले असून तेथील मालगाड्या नांदेड, औरंगाबाद स्थानकाकडे वळविण्यात येणार असल्याचे सिंघ यांनी सांगितले. तसेच औरंगाबाद येथील मालधक्क्याच्या सपाटीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे.  सध्या मालवाहतूक करण्यासाठी एक साप्ताहिक पार्सल एक्सप्रेस चालविण्यात येत आहे तसेच सचखंड एक्सप्रेस ला एक लगेज डब्बा जोडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देशांमध्ये चालविण्यात येत असलेल्या 200 रेल्वे गाडयापैकी नांदेड स्थानकावरून सचखंड एक्सप्रेस नियमितपणे धावत आहे. या गाडीला 34 टक्के प्रवासी मिळत असून दररोज बत्तीस लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे सिंग यांनी सांगितले. मनमाड- परभणी दरम्यान विद्युतीकरनाचे काम टेंडर प्रक्रियेत अडकल्याने त्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले तर पूर्णा अकोला विद्युतीकरण 2022 पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अक्षय ड्रायक्लिनरने नियमितपणे नियमानुसार बिले दाखल केली नाही, त्यामुळे त्यांची बिले रखडल्याचे सिंघ यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांसाठी 30 कोच तयाररेल्वे प्रशासनाने देशात विविध स्थानकात 5 हजार डब्यामध्ये सर्व आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 30 डब्बे हे नांदेड विभागात असून योग्य वेळी कोरोना रुग्णासाठी त्याचा वापर करण्यात येईल. तसेच रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येकवेळी सर्व गाड्या सॅनिटायिझ करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे, असे सिंघ यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादNandedनांदेडpassengerप्रवासी