शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आम्ही बैठकीत असताना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते : शरद पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:00 IST

नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

नांदेड : पुलवामा घटना ही देशावरचे संकट आहे, अशा संकटात आम्ही एकीची दर्शन घडवितो असा लौकिक आहे. परंतु, गृहमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सर्वजण हजर असतांना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथे महाआघाडीच्या पहिल्या प्रचार सभेत केली. 

शंकरराव मी गृहमंत्री होतो, देशाची ताकद काय आहे याची आम्हाला माहिती आहे. शास्त्री, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, ही धमक त्यांच्यात होती. निवडणूक आल्या जातील परंतु देशात सध्या चिंतेची परिस्थिती आहे.दररोज जवान शहीद होत आहेत, दरवर्षी हल्ले वाढत आहेत, असे असताना सरकार केवळ '56 इंच' छातीच्या गोष्टी करते असेही पवार यावेळी म्हणाले. तसेच नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

शेतकऱ्यांना नियमात अडकवले आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना केवळ नियम अन निकषांच्या कचाट्यात अडकवले गेले. देश जगात गहू, कापूस, साखर निर्यात करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आम्ही आणला, बळीराजाने त्यासाठी घाम गळाला, बळीराजा उध्वस्त झाला तर देश उध्वस्त होईल असेही ते म्हणाले 

राफेलचे भूत सरकारला गाडणार लबाडच्या घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नाही. संरक्षण खात्याच्या काम आम्ही ही पाहिले आहे. एका विमानाची किंमत 500 कोटी हुन 1600 कोटींवर नेली, बाकीचे पैसे गेले कुठे, हे राफेलचे भूत सरकारला गडल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारprime ministerपंतप्रधानBJPभाजपा