शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नांदुसा येथे टँकरमधून दूषित पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:38 IST

नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे टँकर मधून नागरिकांना मंगळवारी पाण्यात चक्क चाटू आढळून आले. संतप्त ग्रामस्थ यांनी पाणी घेण्यास नकार दिला. दूषित पाणी पुरवठा कसा झाला याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली.

ठळक मुद्देग्रामस्थ आक्रमकनांदेड बीडीओंनी पाहणी करुन शुद्ध पाण्याचे दिले आदेश

मालेगाव : नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे टँकर मधून नागरिकांना मंगळवारी पाण्यात चक्क चाटू आढळून आले. संतप्त ग्रामस्थ यांनी पाणी घेण्यास नकार दिला. दूषित पाणी पुरवठा कसा झाला याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. गट विकास अधिकारी यांनी नांदुसा येथे येऊन टँकर मधील दूषित पाण्याची पाहणी करून या बाबत चा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे मागील काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या गावाला प्रशासनकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा होत आहे.विशेष म्हणजे नांदेड शहरातील जळकुंभातुन टँकरमधून पाणी पुरवठा होत आहे़ ३० एप्रिल रोजी नागरिकांना टँकर मधील पाण्यात चक्क चाटू आढळून आले. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने हे पाणी आरोग्यास धोकादायक ठरू शकते म्हणून नागरिकांनी टँकर चे पाणी घेण्यास नकार दिला. पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना घटनास्थळी बोलविले व टँकर चे पाण्याची पाहणी करण्यास भाग पाडले. गट विकास अधिकारी यांनी नांदुसा येथील दूषित पाण्याची चौकशी करून तसा अहवाल कारवाई साठी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. दूषित पाणी पुरवठा कडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. हेच दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. याचे गांभीर्य मात्र प्रशासनाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत आहेत.पाण्यात आढळले चाटूनांदेड शहरातील जळकुंभातुन टँकरमधून पाणी पुरवठा होत आहे़ ३० एप्रिल रोजी नागरिकांना टँकर मधील पाण्यात चक्क चाटू आढळून आले. हे पाणी आरोग्यास धोकादायक ठरू शकते म्हणून नागरिकांनी टँकरचे पाणी घेण्यास नकार दिला.

नांदुसा येथे टँकर मधून दूषित पाणी पुरवठा झाला आहे.मी प्रत्यक्ष पाहणी केली आहे याबाबत महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत-समृद्धी दिवाणे, गटविकास अधिकारी, प.स.नांदेडनांदुसा येथे टँकर मधून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामस्थनी माहिती दिली. पंचायत समितीच्या स्तरावरून अधिकारी यांनी कार्यवाही केली आहे-सुखदेव जाधव, सभापती, प.स.नांदेडमागील तीन दिवसापासून गावात टँकर मधून दूषित पाणी पुरवठा होत आहे. मंगळवारी सकाळी चक्क टँकर च्या पाण्यात चाटू आढळून आले. हे पाणी आमच्या आरोग्यास धोकादायक आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे- मल्लिकार्जुन जनकवाडे, नागरिक, नांदुसा़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater pollutionजल प्रदूषण