शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मोदींनी गुजरातचे भले केले परंतु शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाले : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:23 IST

भारताची कृषी बाजारपेठ खुली केली नाही तर २५ टक्केऐवजी ५० टक्के शेतमालाला कर लावला जाईल. तसे केले तर इथला शेतकरी मरेल.

कंधार, जि. नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे भले केले. मात्र, देशातील शेतकऱ्यांना ते उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कंधार तालुक्यातील पानभोसी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची कृषी बाजारपेठ अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी खुली करा, अशी मागणी केली आहे. भारताची कृषी बाजारपेठ खुली केली नाही तर २५ टक्केऐवजी ५० टक्के शेतमालाला कर लावला जाईल. तसे केले तर इथला शेतकरी मरेल. सध्या भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या शेतमालावर १० टक्के कर लागतो. तो त्यांनी २५ टक्के द्यायचा ठरविला आहे. तरीही भारताचे कृषिक्षेत्र अमेरिकेच्या शेतकऱ्यांना खुले केले नाही, तर २५ टक्केऐवजी ५० टक्के कर शेतमालावर केल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी परिस्थिती पाहता देशाच्या शेतकऱ्यांना ते उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. शासनाचा कापसाचा हमीभाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये आहे. आपल्या देशात एकरी उत्पन्न १४ क्विंटल एकरी शेतकरी घेतो. पण, अमेरिकेतील शेतकरी ३० ते ३५ क्विंटल एकरी उत्पन्न घेतो. त्यांच प्रोडक्शन आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे इथली बाजारपेठ खुली केली आणि त्यांनी कापसाचे प्रोडक्शन आपल्या भारतात आणले, तर आपला कापसाचा भाव ३ हजार २०० ते ३ हजार ५०० पर्यंत येईल, असेही ते म्हणाले.

या सोहळ्याला माजी आ. ईश्वरराव भोसीकर, फारूक अहमद, राजेंद्र भोसीकर, शिवा नरंगले, मनोहर भोसीकर, सरपंच राजश्री भोसीकर, महेश भोसीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरprime ministerपंतप्रधानNandedनांदेड