शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात शाश्वत सिंचन कागदावरच; उद्दिष्टाच्या तुलनेत शेततळे योजनेचे जिल्ह्यात अवघे २९ टक्के काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:05 IST

नांदेड जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्‍या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ 

ठळक मुद्दे वर्षभरापूर्वी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला़ मात्र शेतकर्‍यांनी अर्ज करूनही त्यांना शेततळे मिळत नसल्याचे चित्र नांदेडसह राज्यभरात दिसून येत आहे़ नांदेड जिल्ह्यात तर या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़

- विशाल सोनटक्के नांदेड : शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच वारंवार पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला़ मात्र शेतकर्‍यांनी अर्ज करूनही त्यांना शेततळे मिळत नसल्याचे चित्र नांदेडसह राज्यभरात दिसून येत आहे़ नांदेड जिल्ह्यात तर या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्‍या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ 

राज्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे़ त्याचबरोबर ते अनिश्चितही आहे़ यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील मोठ भूभाग पूर्णत: पावसावर अवलंबून असल्याने पावसाने ओढ देताच त्याचा पिकावर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते़ तीन वर्षापूर्वी मराठवाड्याला अत्यल्प पर्जन्यमानामुळे अशाच तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागले होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला होता़ या दौर्‍यावेळी पाणीटंचाई व त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी विविध ठिकाणच्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

 त्यामुळेच मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून  जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्याची घोषणा केली़ प्रायोगिक तत्त्वावर शेततळी घेतलेल्या ठिकाणच्या शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे निदर्शनास आले असून शेततळ्यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात शाश्वतता आल्याचे सांगत ही योजना शेतकर्‍यांसाठी संजीवनी देणारी असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी काढले होते़ मात्र नांदेड जिल्ह्यातील चित्र पाहिल्यानंतर प्रशासनाने ही योजना गांभीर्याने घेतलेली नसल्याचे दिसून येते़ 

मागेल त्याला शेततळे योजना जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला़ एकट्या नांदेड जिल्ह्यातून सात हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी शेततळ्यांसाठी अर्ज दाखल केले़ यावर ४ हजार ८८४ शेततळ्यांना मंजुरी देवून प्रशासनाने कार्यारंभ आदेशही जारी केले़ मात्र वर्ष उलटत आले तरी शेततळ्यांची ही कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही़ कार्यारंभ आदेश जारी झाल्यानंतर कृषि विभागाने ४ हजार ८७७ शेततळ्यांची आखणीही करून दिली़ मात्र त्यातील अवघ्या १ हजार १४३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून सद्यस्थितीत ८८ शेततळ्यांची कामे सुरू असल्याने नांदेड जिल्ह्याने ४ हजार शेततळी बांधण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यातही नांदेड, अर्धापूर, बिलोली, किनवट, माहूर आणि उमरी या सहा तालुक्यांत सद्यस्थितीत शेततळ्याचे एकही काम सुरू नसल्याचे विदारक चित्र आहे़ 

सहा तालुक्यात योजनेची कामे ठप्पशेततळ्यांसाठी शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळत असला तरी या योजनेतंर्गत जिल्ह्यातील तब्बल सहा तालुक्यात एकही काम सुरू नसल्याचे आॅक्टोबर अखेरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, बिलोली, किनवट, माहूर आणि हिमायतनगर या तालुक्यांचा समावेश आहे़ इतर तालुक्यातील परिस्थिती  समाधानकारक नाही़  मुदखेड, देगलूर, हदगाव या तीन तालुक्यात प्रत्येकी एक काम सुरू आहे़ तर कंधार, भोकरमध्ये अवघी दोन कामे सुरू आहेत़ मुखेड व उमरी तालुक्यात प्रत्येकी २३ कामे सुरू आहेत़ 

१,११,१११ चा आकडा गाठणार कसा?प्रारंभी राज्य शासनाने ठराविक जिल्ह्यात सदर योजना राबविण्यास मंजुरी दिली होती़ त्यावेळी ५१ हजार ५०० शेततळी राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते़ मात्र या योजनेसाठी शेतकर्‍यांतून तब्बल १ लाख ४७ हजार ७१० एवढे अर्ज प्राप्त झाले़ हा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचे जाहीर करीत सुधारित लक्ष्यांकही १,११,१११ एवढा केला़ मात्र नांदेडसह बहुतांश जिल्ह्यांत मागेल त्याला शेततळे देण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते़ 

आखणी केल्यानंतरही कामाला गती मिळेना४८८४ शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर ४८७७ शेततळ्यांचे आखणी करून देण्यात आली़ मात्र त्यानंतरही कामाला गती मिळालेली नाही़ 

योजनेची अशी आहे तालुकानिहाय स्थिती  

तालुका     कार्यारंभ    पूर्ण झालेली    उद्दिष्टाची                 आदेश         कामे             टक्केवारीनांदेड         ९७               १६                 १३ %अर्धापूर      ८८               ११                    ९ %मुदखेड     १२०                २                   २ %लोहा         ४०१           १५२                 ५४ %कंधार       ३४२          १०१                   २८ %देगलूर      ३२१           ११०                   ३९ %मुखेड       ३२५           ६५                   १७ %नायगाव   २९१            ३३                   १२ %बिलोली    १४८           २५                   १४ %धर्माबाद    ६५           ३७                   ४६ %किनवट     ८१५       १३६                    २६ %माहूर        २७१         ४३                    ३१ %हदगाव     ९२२        २८१                   ४८ %भोकर      २६३         ४८                    २७ %हिमायतनगर  २५५        ४७             २१ %उमरी        १६०         ३६                     २३ %एकूण    ४८८४      ११४३                   २९ %

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी