शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

नांदेड जिल्ह्यात शाश्वत सिंचन कागदावरच; उद्दिष्टाच्या तुलनेत शेततळे योजनेचे जिल्ह्यात अवघे २९ टक्के काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:05 IST

नांदेड जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्‍या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ 

ठळक मुद्दे वर्षभरापूर्वी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला़ मात्र शेतकर्‍यांनी अर्ज करूनही त्यांना शेततळे मिळत नसल्याचे चित्र नांदेडसह राज्यभरात दिसून येत आहे़ नांदेड जिल्ह्यात तर या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़

- विशाल सोनटक्के नांदेड : शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच वारंवार पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला़ मात्र शेतकर्‍यांनी अर्ज करूनही त्यांना शेततळे मिळत नसल्याचे चित्र नांदेडसह राज्यभरात दिसून येत आहे़ नांदेड जिल्ह्यात तर या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्‍या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ 

राज्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे़ त्याचबरोबर ते अनिश्चितही आहे़ यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील मोठ भूभाग पूर्णत: पावसावर अवलंबून असल्याने पावसाने ओढ देताच त्याचा पिकावर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते़ तीन वर्षापूर्वी मराठवाड्याला अत्यल्प पर्जन्यमानामुळे अशाच तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागले होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला होता़ या दौर्‍यावेळी पाणीटंचाई व त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी विविध ठिकाणच्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

 त्यामुळेच मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून  जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्याची घोषणा केली़ प्रायोगिक तत्त्वावर शेततळी घेतलेल्या ठिकाणच्या शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे निदर्शनास आले असून शेततळ्यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात शाश्वतता आल्याचे सांगत ही योजना शेतकर्‍यांसाठी संजीवनी देणारी असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी काढले होते़ मात्र नांदेड जिल्ह्यातील चित्र पाहिल्यानंतर प्रशासनाने ही योजना गांभीर्याने घेतलेली नसल्याचे दिसून येते़ 

मागेल त्याला शेततळे योजना जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला़ एकट्या नांदेड जिल्ह्यातून सात हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी शेततळ्यांसाठी अर्ज दाखल केले़ यावर ४ हजार ८८४ शेततळ्यांना मंजुरी देवून प्रशासनाने कार्यारंभ आदेशही जारी केले़ मात्र वर्ष उलटत आले तरी शेततळ्यांची ही कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही़ कार्यारंभ आदेश जारी झाल्यानंतर कृषि विभागाने ४ हजार ८७७ शेततळ्यांची आखणीही करून दिली़ मात्र त्यातील अवघ्या १ हजार १४३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून सद्यस्थितीत ८८ शेततळ्यांची कामे सुरू असल्याने नांदेड जिल्ह्याने ४ हजार शेततळी बांधण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यातही नांदेड, अर्धापूर, बिलोली, किनवट, माहूर आणि उमरी या सहा तालुक्यांत सद्यस्थितीत शेततळ्याचे एकही काम सुरू नसल्याचे विदारक चित्र आहे़ 

सहा तालुक्यात योजनेची कामे ठप्पशेततळ्यांसाठी शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळत असला तरी या योजनेतंर्गत जिल्ह्यातील तब्बल सहा तालुक्यात एकही काम सुरू नसल्याचे आॅक्टोबर अखेरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, बिलोली, किनवट, माहूर आणि हिमायतनगर या तालुक्यांचा समावेश आहे़ इतर तालुक्यातील परिस्थिती  समाधानकारक नाही़  मुदखेड, देगलूर, हदगाव या तीन तालुक्यात प्रत्येकी एक काम सुरू आहे़ तर कंधार, भोकरमध्ये अवघी दोन कामे सुरू आहेत़ मुखेड व उमरी तालुक्यात प्रत्येकी २३ कामे सुरू आहेत़ 

१,११,१११ चा आकडा गाठणार कसा?प्रारंभी राज्य शासनाने ठराविक जिल्ह्यात सदर योजना राबविण्यास मंजुरी दिली होती़ त्यावेळी ५१ हजार ५०० शेततळी राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते़ मात्र या योजनेसाठी शेतकर्‍यांतून तब्बल १ लाख ४७ हजार ७१० एवढे अर्ज प्राप्त झाले़ हा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचे जाहीर करीत सुधारित लक्ष्यांकही १,११,१११ एवढा केला़ मात्र नांदेडसह बहुतांश जिल्ह्यांत मागेल त्याला शेततळे देण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते़ 

आखणी केल्यानंतरही कामाला गती मिळेना४८८४ शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर ४८७७ शेततळ्यांचे आखणी करून देण्यात आली़ मात्र त्यानंतरही कामाला गती मिळालेली नाही़ 

योजनेची अशी आहे तालुकानिहाय स्थिती  

तालुका     कार्यारंभ    पूर्ण झालेली    उद्दिष्टाची                 आदेश         कामे             टक्केवारीनांदेड         ९७               १६                 १३ %अर्धापूर      ८८               ११                    ९ %मुदखेड     १२०                २                   २ %लोहा         ४०१           १५२                 ५४ %कंधार       ३४२          १०१                   २८ %देगलूर      ३२१           ११०                   ३९ %मुखेड       ३२५           ६५                   १७ %नायगाव   २९१            ३३                   १२ %बिलोली    १४८           २५                   १४ %धर्माबाद    ६५           ३७                   ४६ %किनवट     ८१५       १३६                    २६ %माहूर        २७१         ४३                    ३१ %हदगाव     ९२२        २८१                   ४८ %भोकर      २६३         ४८                    २७ %हिमायतनगर  २५५        ४७             २१ %उमरी        १६०         ३६                     २३ %एकूण    ४८८४      ११४३                   २९ %

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी