शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

जाती-पातीचे राजकारण जनता हाणून पाडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:47 IST

पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे.

ठळक मुद्देचव्हाण : नांदेडकर पाठीशी याचा विश्वास

नांदेड : पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे. या निवडणुकीत मतदार जाती-पातीचे राजकारण हाणून पाडतील, असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विविध समाजघटकांशी चव्हाण यांनी रविवारी संवाद साधला. यावेळी व्यंकट मुदीराज, दीपाली मोरे, बालाजी मद्देवाड, छगन पाटील, सिद्धेवर पिटलेवार, बालाजी बोईनवाड, शेख गफार, रमेश यादव आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री असताना आदिवासी कोळी तसेच भोई समाजबांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगत इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता तुमच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असा शब्द चव्हाण यांनी दिला. आदिवासी विरुद्ध मन्नेरवारलू आणि आदिवासी विरुद्ध कोळी असा विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विद्यमान भाजप सरकार दलित, अल्पसंख्याकांच्या विरोधातील आहे. त्यामुळे या सरकारविरोधात मतदानाच्या माध्यमातून आवाज उठवा, असे आवाहनही त्यांनी केले. भोकरमधील लघळूदमध्ये समाजबांधवांचा खून होतो. परंतु अद्यापही त्याचा तपास लागला नसल्याचे सांगत या सरकारच्या काळात पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. या सरकारला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आदिवासी कोळी समाज, भोई समाज, मच्छीमार संघटना तसेच ख्रिस्ती बांधवांनी चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत काँग्रेसच्याच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अख्खी भाजपा भेदरलीनरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह पियुष गोयलसह अख्खी भाजपाची नेतेमंडळी नांदेडमध्ये येते. यावरुन भाजपा किती भेदरलेली आहे हे स्पष्ट होते. मात्र हे नेते येवूनही त्यांचा उपयोग होणार नाही. कारण जिल्ह्याचा विकास कोणी केला? याची जाणीव नांदेडकरांना आहे. कामे आम्ही करायची आणि श्रेय दुसरे लाटणार हे आता चालणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण