शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

सांगा मायबाप जगावं कस ? मुलांप्रमाणे जोपासलेली पपईची बाग वादळाच्या तडाख्याने भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 18:22 IST

मनाठा येथील काही शेतकऱ्यांनी हटके प्रयोग करत शेतात पपईची लागवड केली.

हदगाव : अचानक वातावरणात बदल झाल्याने मनाठा येथे सोसाट्याचे वादळवारे वाहू लागले.यामुळे अनेकांची धावपळ उडाली. मात्र याचा मोठा फटका शेतीला बसला आहे. शेतकऱ्याने मुलांप्रमाणे जोपासलेली पपईची बाग पाच मिनिटांच्या वादळाने भुईसपाट झाल्याची घटना गुरुवारी ( दि. १८ ) सायंकाळी घडली. निसर्गाच्या या फटक्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मनाठा येथील काही शेतकऱ्यांनी हटके प्रयोग करत शेतात पपईची लागवड केली. श्रीराम सिताराम राठोड यांची गट क्रमांक ३४१ मध्ये दोन हैक्टर जमीन आहे. संयुक्त कुटुंब असल्याने १३ लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे.  पारंपारिक पीक सोडून त्यांनी मागील वर्षी मार्चमध्ये शेतीत काहीसा वेगळा प्रयोग केला. बंगरुळ येथून त्यांनी ७०० पपईची रोपे आणून १ एकर शेतात लावली. पपई येईपर्यंत त्यांनी यावर ४० ते ५० हजार रुपये खर्च केले. दिवाळीपासून त्यांनी फळांची विक्री त्यांनी सुरू केली. गावात फिरुन आठवडी बाजारात ते पपई विकु लागले. एका झाडाला ३० ते ४० फळे लागली. यातून प्रती झाड ७०० -८०० रुपये मिळण्याचा त्यांचा अंदाज होता. 

गुरुवारी सायंकाळी राठोड कुटुंब शेतात जेवायला बसण्याच्या तयारीत होते. यावेळी अचानक वातावरण बदले आणि वादळ सुरु झाले. पुढच्या ५ ते १० मिनिटांमध्ये पपईची ३०० झाडांची संपूर्ण बाग कोलमडून पडली. मुलाप्रमाणे जोपासना केलेली झाडे उन्मळून पडत असतानाही निसर्गापुढे शेतकरी हतबल होता. राठोड कुटुंब तसेच ताटावरुन उठले. उन्मळून पडत असलेल्या बागेकडे पाहत त्यांच्या डोळ्यात पाणी तरारळे. दरम्यान, याच बागेची जोपासना करताना राठोड यांच्या मुलाला विजेचा धक्क्का बसला होता. कर्ज काढून उपचार करत राठोड यांनी त्याला वाचवले. पपईच्या विक्रीतून कर्ज फेडू असे त्यांचे नियोजन होते. मात्र, आता वादळाने सारेच नष्ट केल्याने कर्ज कसे फिटणार या विवंचनेत राठोड कुटुंबीय आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड