शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दीड हजारांवर शेतकऱ्यांना मिळाली सौर कृषीपंप जोडणी, ६८७ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:27 IST

सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना  महिनाभरापासून मिळाली कामाला गती

नांदेड : जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जवळपास २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले असून त्यापैकी १५१३ शेतकऱ्यांना कृषीपंपांची जोडणी दिली आहे. तर उर्वरित ६८७ शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत. त्यात सबसिडी मिळणारे सौरपंप मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून  मिळविण्यासाठी ६ हजार ९४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज रद्द झाले.  छाननीत वैध झालेल्या अर्जदारांपैकी २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहेत. त्यात २१५७ शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केली आहे. दरम्यान, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित वेळेत पोहोचू शकले नव्हते. परंतु, मागील महिनाभरापासून सदर कामास गती मिळाली आहे. 

निवडलेल्या कंपन्यांना किती उद्दिष्ट?जिल्ह्यात १३ कंपन्यांपैकी सर्वाधिक ६८० लक्ष असलेल्या टाटा पॉवर सोलार कंपनीने ५६३ पंप बसविलेले आहेत. त्यानंतर सीआरआय पंप- २८८ पैकी २५९ पंप बसविले, रवींद्र एनर्जी - ८४ पैकी ३९, मुद्रा सोलार - ७७ पैकी १३, जैन एरिगेशन ४४ पैकी ४३, एल ॲण्ड टी- १९३ पैकी १०९, स्पॅन - ३९१ पैकी ३००, शक्ती - १६४ पैकी ९३, रोटोमॅग- ३५ पैकी ००, नोवास ग्रीन - १२७ पैकी ५०, क्लरो - २१ पैकी १९, रॉमेट- १८ पैकी ००, जीके एनर्जी ३१ पैकी २५ सोलार पंप.

कोरोनामुळे टाळेबंदी आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सौर पंपासाठी लागणारे साहित्य शेतात पोहोचविण्यासाठी अडचणी येत होत्या. परंतु, आता सदर कामास गती मिळाली नाही. लवकरात लवकर सोलार पंप शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे.   -संतोष वहाणे, अधीक्षक अभियंता, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती