शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान टाळण्यासाठी शेतमाल तारण योजना सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:10 IST

जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरु करण्याचे आदेश सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.

नांदेड : सध्या शेतमालाच्या कोसळलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून हे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरु करण्याचे आदेश सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सचिवांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतमाल तारण योजनेबाबत आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोणातून कृषी पणन मंडळ  १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चणा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाना, सुपारी व हळद या शेतमालांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या चालू बाजार भावानुसार होणाऱ्या किमतीच्या  ७५ टक्केपर्यंत रक्कम सहा महिने (१८० दिवस) कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध  करुन देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. बाजार समितीकडे स्वत:चे गोदाम नसल्यास खाजगी गोदाम भाड्याने घेऊन सदर योजना राबवू शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमालाचा चालू वर्षाचा सातबारा उतारा, पीकपेरा, आधारकार्ड झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे बाजार समितीस द्यावी लागणार आहेत. शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी  फायदेशीर आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने ही योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी  बाजार समित्यांनी व्यापक प्रमाणात या योजनेबद्दल शेतकऱ्यांत जनजागृती करावी. विविध माध्यमातून त्याची प्रचार, प्रसिद्धी करावी,अशी सूचना जिल्हा उपनिबंधक फडणीस यांनी केले  आहे.

गतवर्षी २ कोटी ३५ लाखांचे तारण कर्जगतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबादकडून शेतमाल तारण योजना यशस्वीपणे राबवून धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना २ कोटी ३५ लाख शेतमाल तारण कर्ज देण्यात आले. सुगीचा हंगाम सुरु  होण्याच्या काळात शेतमालाच्या दरात असणाऱ्या मंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेत सहभागी करुन घ्यावे, असेही बाजार समित्यांना सांगण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमाNandedनांदेड