शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:07 IST

देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

ठळक मुद्देअमिता चव्हाण यांची सरकारवर टीका

नांदेड : देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकरी, व्यापारी व सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे काम मोदी व फडणवीस सरकारने केले. त्यामुळे या सरकारला सत्तेतून बाहेर काढून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन भोकरच्या आ. अमिताताई चव्हाण यांनी केले.बिलोली तालुक्यातील लोहगाव व आरळी या जिल्हा परिषद मतदारसंघातील बुथ कमिटी कार्यकर्ता शिबिरामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, मंगलाताई निमकर, जि.प.सदस्य संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, गंगाधर सोंडारे, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, केदार पाटील सोळुंके, प्रा.डॉ.कविता सोनकांबळे उपस्थित होते़ यावेळी आ़चव्हाण म्हणाल्या, बुथ कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असून या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे पाळेमुळे अधिक मजबूत करण्याचे काम होत आहे. प्रत्येक बुथ कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जास्तीचे मतदान करून घेणे गरजेचे आहे. मोदी व फडणवीस सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शेतकºयांना बँकेत खाते काढण्यासाठी ३ हजार रुपए भरावे लागले. या खात्यावर १५ लाख रुपये येतील या भावनेने लाखो लोकांनी बँकेत खाते काढले खरे, परंतु खात्यावर पैसे तर जमा झालेच नाहीत, परंतु जे पैसे भरलेत तेही आता काढता येत नाहीत. शेतीमालाचे भाव कमी केले. उलट पेट्रोल-डिझेल, गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले. शेतकºयांच्या मालाची सरकार खरेदी करीत नाही. या शासनाने शेतकºयांना बँकेच्या व आॅनलाईन अर्ज भरून घेणाºया केंद्राच्या लाईनमध्ये उभे केले. या भागात काँग्रेस आमदार नसल्यामुळे जनतेची कामे झाली नाहीत.

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण