शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एक झाड माझे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:18 IST

वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे़ या अभियानाचा प्रारंभ पर्यावरणदिनी नांदेड येथील केमिस्ट भवन परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला़

ठळक मुद्देएक हजार वृक्ष लावणार संवर्धनासाठी करणार दहा लाख रूपये खर्च

नांदेड : वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे़ या अभियानाचा प्रारंभ पर्यावरणदिनी नांदेड येथील केमिस्ट भवन परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला़पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येत ३० मे रोजी पहिली बैठक घेवून एक हजार वृक्षलागवड करून संगोपन, संवर्धन करण्याचा निर्धार केला़ यावेळी आनंदवन मित्र परिवार, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, साईप्रसाद यासह विविध सेवाभावी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती़ दरम्यान, सदर अभियानास एक झाड माझे अभियान मित्र परिवार असे नाव देण्यात आले असून त्याअंतर्गत सेवाभावी वृत्तीने काम सुरू करण्यात आले आहे़पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली़ यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़उद्धव भोसले, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, आयुक्त लहुराज माळी, मुख्य वनसंरक्षक अधिकारी श्रीकांत ठाकरे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती़ या अभियानात आजपर्यंत दोनशेहून अधिक जणांनी सहभाग नोंदविला आहे़केमिस्ट भवन येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनासाठी सखोल मार्गदर्शन करून उपक्रमाचे कौतुक केले़ यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी शिवकन्या बहेनजी, दीपक कोठारी, अशोक गंजेवार, लक्ष्मण क्षीरसागर, संजय बजाज, विठ्ठल पावडे, अमित काबरा, शमेंद्र हुंडीवाला, डॉ़अतुल काबरा, डॉ़ दळवी, प्रा़ढगे आदींची उपस्थिती होती़ या उपक्रमाचा खर्च पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत़भारतीय मातीतील वृक्षांची होणार लागवडवृक्षारोपण करताना भारतीय मातीतील आणि आपल्या संस्कृतीतील झाडांची निवड केली जाणार आहे़ जेणेकरून भविष्यात त्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट पहायला मिळाला पाहिजे़ यामध्ये चिंच, लिंब, जांभूळ, पिंपळ, वड, आवळा आदी प्रकारची झाडेला वण्यात येणार आहेत़सहा ते दहा फूट उंच असणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाणार असून त्याचे वर्षभर संगोपन केले जाणार आहे़ आॅक्टोबरपर्यंत झाडे पावसाच्या पाण्यावर जगतात़ तेथून पुढे नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत वृक्षाला पाणी घालणे, फवारणी करणे, खत घालण्यापर्यंतचे नियोजन आहे़

टॅग्स :Nandedनांदेडenvironmentवातावरणforestजंगल