शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नांदेड शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:17 AM

विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी : दरदिवशी सुरु आहे ०.३२ दलघमी पाण्याचा उपसा

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्यासाठी आता दोनऐवजी तीन दिवसांची वाट पहावी लागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा, औद्योगिक वापर यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून दररोज ०.३२ दलघमी पाणी उपसले जात आहे. या सर्व पाणी उपशामुळे विष्णूपुरीतील उपलब्ध जलसाठा पाहता शहराला मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे २५ एप्रिलपासून नांदेड शहरात २ दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी घेतला आहे.महापालिकेने शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३२ दलघमी पाणी राखीव केले होते. शहराला दरवर्षी ३२.४० दलघमी पाणी आवश्यक आहे. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात ९.४५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. शहराला दरमहा २.७० दलघमी पाणी आवश्यक आहे. मात्र प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला उपसा यामुळे पाणी झपाट्याने कमी होत आहे. यावर आता उपाययोजना आवश्यक आहेत.विष्णूपुरीसह नांदेड शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणी दिले जाते. इसापूर प्रकल्पातून आतापर्यंत तीन पाणीपाळ्या घेतल्या आहेत. पहिली पाळी २० डिसेंबर २०१८ रोजी, दुसरी १ मार्च २०१९, तिसरी ३ मार्च आणि आता चौथी पाणीपाळी २५ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविली आज बैठकविष्णूपुरीतील झपाट्याने कमी होत असलेला पाणी उपसा पाहता नांदेड शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. मे अखेरपर्यंत कसेबसे पाणी उपलब्ध होईल. पण पावसाळा लांबला तर काय? हा प्रश्नही पुढे आला आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापालिकेसह पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस आदी विभागांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जिल्हा प्रशासनाने विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकांचाही आढावा घेतला जाणार आहे.इसापूरचे पाणी पोहोचणारपर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी सांगवी बंधाºयात इसापूर प्रकल्पाचे पाणी २४ एप्रिल रोजी सोडण्यात आले आहे. हे पाणी २५ एप्रिल रोजी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे. या पाण्यातून उत्तर नांदेडची जवळपास २५ दिवसांची तहान भागणार आहे. यामुळे विष्णूपुरीतून उपसा कमी होणार आहे.