शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

उर्ध्व पैनगंगेच्या पाणलोट क्षेत्रात प्रकल्प नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:12 IST

अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नांदेड : पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी अडविल्यामुळे मागील काही वर्षांत हे धरण फार कमी वेळा पूर्ण क्षमतेने भरते. उर्ध्व पैनगंगेची अशी अवस्था टाळण्यासाठी त्याच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने सिंचन प्रकल्प उभारू नका, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मूळ मंजुरीनुसार इसापूर व सापळी या ठिकाणी सिंचन प्रकल्प उभारला असून, इसापूर धरणापासून निघणारा डावा कालवा ८४ कि.मी.चा, तर उजवा कालवा १७७ कि.मी. लांबीचा आहे. त्यासोबतच सापळी धरणाचा ६ कि.मी.चा पूरक कालवा निर्माण केला आहे. १९६८ मध्ये मान्यता दिलेल्या मूळ आराखड्यात ११९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा अपेक्षित होता. मात्र, धरणाच्या वरील बाजूचा पाणी वापर वाढल्यामुळे १०८४ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध झाले. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या वर पाणी साठवत गेले, तर इसापूर आणि सापळी धरणामुळे निर्माण होणारे सिंचन क्षेत्र ६,४०,००० हेक्टरपर्यंत कमी होईल़ त्यामुळे हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्याचा सिंचन अनुशेष वाढेल. धरणावर आधारित शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण