शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

ना बसायला जागा, ना स्वच्छतागृह; सोयीसुविधा नसतानाही नांदेड बसस्थानकाचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:40 IST

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांचे हाल; ‘साहेब एसीतून आदेश देतात, इथे एक दिवस येऊन बघा!’

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे अखेर प्रशासनाने बसस्थानक स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपासून हे बसस्थानक कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले. मात्र स्थलांतरीत करताना प्रवाशांच्या प्राथमिक गरजांचा विचार न करता, केलेल्या बदलामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दररोज ९०० बसद्वारे सुमारे १८०० फेऱ्यांच्या माध्यमातून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. अशावेळी बसस्थानकातील सोयी-सुविधा गर्दीनुसार आवश्यक असताना तात्पुरत्या बसस्थानकावर पंखे नाहीत, वीज पूर्णपणे उपलब्ध नाही, बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही आणि स्वच्छतागृहाचे काम अजूनही सुरूच आहे. परिणामी महिला, वयोवृद्धांसह लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गरमीचा प्रहर त्यात धुळीचा कहरसध्या एप्रिल महिना असून तापमान तब्बल ४१ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशा कडक उन्हात बसण्यासाठी सावली नाही, वाऱ्यासाठी पंखे नाहीत आणि पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नाही. त्यात बस येताना उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांचे हाल दुप्पट झाले आहेत. निवाऱ्यासाठी उभारलेल्या टीनशेडमध्ये बसलेल्या प्रवाशांवर उकाड्यामुळे चक्कर येण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांचे हालया स्थलांतरासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकाही झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने आवश्यक सुविधा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचना अमलात आणल्या गेल्या नाहीत. दरम्यान, स्थलांतराची लगीनघाई करत १३ एप्रिलपासून बसस्थानक स्थलांतरीत करण्याचे पत्रक काढण्यात आले. मात्र येथे कोणत्याच सोयी-सुविधा नसल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यावर विभाग नियंत्रकांनी पथक पाठवून सोयी-सुविधांची पूर्तता करूनच स्थलांतर करण्याचे सुधारित लेखी आदेश १२ रोजी काढले. परंतु, या आदेशाला केराची टोपली दाखवत यंत्रणेने कोणत्याही सुविधेविना गाड्या कवठ्यातून पाठविण्यास प्रारंभ केला आहे.

‘साहेब एसीतून आदेश देतात, इथे एक दिवस येऊन बघा!’एक प्रवासी म्हणाले, ‘साहेब बसलेत एसीमध्ये, फाईलवर सही करतात. पण एक दिवस इथे येऊन उभं राहून बघा, काय त्रास होतो! किती ऊन आहे, किती धूळ आहे, माणूस गरमीने हैराण होतो. इथे आल्याशिवाय त्यांना कळणार तरी कसं?’ ही प्रतिक्रिया प्रशासनाच्या प्रत्यक्ष सहभागाविना घेतल्या गेलेल्या निर्णयावर थेट बोट ठेवणारी आहे. नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे अखेर प्रशासनाने बसस्थानक स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपासून हे बसस्थानक कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले. मात्र स्थलांतरीत करताना प्रवाशांच्या प्राथमिक गरजांचा विचार न करता, केलेल्या बदलामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडstate transportएसटी