शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ

By प्रसाद आर्वीकर | Updated: June 14, 2024 13:11 IST

केवळ पावसाळ्यात नियुक्ती; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी धुळे, पुण्याहून करावे लागते पथकास पाचारण

नांदेड : राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते. गोल्डन अवरमध्ये मदत न मिळाल्याने अनेक जीव गमाविण्याचा धोका निर्माण होतो. तेव्हा राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या (एनडीआरएफ) अंतर्गत राज्य आपत्ती निवारण बल कार्यरत असते. राज्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांमार्फत तातडीने मदतकार्य केले जाते. त्यामुळे आपत्ती काळामध्ये अनेक जीव वाचू शकतात. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी पावसाळ्यामध्ये एसडीआरएफची केवळ एक तुकडी नियुक्त केली जाते. आपत्ती केव्हाही सांगून येत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी एसडीआरएफची स्वतंत्र पूर्णवेळ तुकडी नियुक्त करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे विदर्भात नागपूर आणि धुळे या दोन ठिकाणी एसडीआरएफची स्वतंत्र तुकडी कार्यरत आहे; परंतु मराठवाड्यात आपत्ती निवारण बलाची तुकडी नसल्याने वेळेत मदत उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक जीव गमवावे लागतात. तेव्हा मराठवाड्यासाठी एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवावी, अशी मागणी होत आहे.

राज्यात बारा ठिकाणी एसआरपीएफ केंद्रमुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर या १२ ठिकाणी राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि कोल्हापूर या ठिकाणी राखीव बलाच्या तीन तुकड्या ठेवल्या आहेत. राज्य राखीव पोलिस बलातील जवानांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देऊन राज्य आपत्ती निवारण बलाची तुकडी कार्यरत केली जाते. विदर्भातील नागपूर आणि धुळे या ठिकाणी एसडीआरएफची तुकडी कार्यरत आहे. मराठवाड्यासाठीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली किंवा जालना येथे एसडीआरएफची पूर्णवेळ तुकडी कार्यरत करणे सोयीचे होऊ शकते.

मदतीसाठी लागतात ७ ते १० तासपावसाळा वगळता इतर काळात मराठवाड्यामध्ये आपत्ती परिस्थिती निर्माण झाली तर मदतकार्य मागविण्यासाठी किमान ८ ते १० तास लागतात. धुळे येथून एसडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी ८ तास तर पुणे येथून एनडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी किमान १० तास लागतात. आपत्ती काळात गोल्डन अवर असलेल्या पहिल्या एक तासात मदत मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात.

एका तुकडीत ३५ जवानराज्य आपत्ती निवारण बलाच्या एका तुकडीमध्ये एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन चालक आणि ३० जवान अशा ३५ जणांचा समावेश असतो.

२८ जणांचे वाचविले होते जीवमागील वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासाठी नियुक्त केलेली एसडीआरएफची टीम नांदेड येथे मुक्कामी होती. या पथकातील जवानांनी मुदखेड, अर्धापूर, कासारखेडा, माहूर आदी ठिकाणी बचाव कार्य करून २८ जणांना पुरातून बाहेर काढले होते. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविण्याचे मोलाचे काम एसडीआरएफच्या जवानांनी केले होते.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस