शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:43 IST

विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या.केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली.नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

नांदेड : आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरा सोशल मिडियावर संदेश टाकत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. आजवर एकटीने सगळं जिंकलं, परंतु कंटाळा येईपर्यंत प्रवास करण्याची माझी तयारी नसल्याचे सांगत विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सूर्यकांता पाटील यांची कारकीर्द चढती राहिली आहे. नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखविल्यानंतर १९८० मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत  त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर गेल्या तर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली. मात्र नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकी वेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणले. त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  बुधवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट करीत आपण राजकीय प्रवास थांबवित असल्याचे म्हटले आहे. या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही, असेही त्यांनी या संदेशामध्ये म्हटले आहे.

सूर्यकांता पाटील यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट अशी आहे...

आता थांबावे असे वाटत नाही,खूप प्रेम मिळाले जळणारे होते, पण प्रेम करणाºयांची संख्या अधिक होती. मला ते सर्व मिळाले जे सामाजिक जीवनात असणाºया व्यक्तीला मिळायला हवे, ४३ वर्ष राजकारणात होते़ एखाद्या राजकुमारी सारखी राहिले़ ४०० रुपयांची साडी ४००० हजाराच्या थाटात नेसली. मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्या सारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता, पण मी आहेच कोण म्हणून, एवढा  शो करायचा? सगळ्यांनीच प्रेम दिले, सन्मान दिला, काहीच तक्रार नाही. आपलीच लायकी नाही हे समजले होते, रागात घेतलेले निर्णय असेच असतात, ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येत नाही़ तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्के समजलंय. त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे? एकटीने सगळे जिंकले, लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही. ज्यांच्यासाठी काम केले त्यांनी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे. यापुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही. बसून कुरवळण्याएवढे काही नाही माझ्याजवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवित  आहे.  सगळ्या सहप्रवासी सहकाºयांचे हार्दिक आभार. मी आहे, कधीही या, घर आणि मी तुमचीच आहे. नमस्कार सगळ्यांना़ थांबते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस