शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:43 IST

विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या.केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली.नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

नांदेड : आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरा सोशल मिडियावर संदेश टाकत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. आजवर एकटीने सगळं जिंकलं, परंतु कंटाळा येईपर्यंत प्रवास करण्याची माझी तयारी नसल्याचे सांगत विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सूर्यकांता पाटील यांची कारकीर्द चढती राहिली आहे. नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखविल्यानंतर १९८० मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत  त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर गेल्या तर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली. मात्र नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकी वेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणले. त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  बुधवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट करीत आपण राजकीय प्रवास थांबवित असल्याचे म्हटले आहे. या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही, असेही त्यांनी या संदेशामध्ये म्हटले आहे.

सूर्यकांता पाटील यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट अशी आहे...

आता थांबावे असे वाटत नाही,खूप प्रेम मिळाले जळणारे होते, पण प्रेम करणाºयांची संख्या अधिक होती. मला ते सर्व मिळाले जे सामाजिक जीवनात असणाºया व्यक्तीला मिळायला हवे, ४३ वर्ष राजकारणात होते़ एखाद्या राजकुमारी सारखी राहिले़ ४०० रुपयांची साडी ४००० हजाराच्या थाटात नेसली. मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्या सारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता, पण मी आहेच कोण म्हणून, एवढा  शो करायचा? सगळ्यांनीच प्रेम दिले, सन्मान दिला, काहीच तक्रार नाही. आपलीच लायकी नाही हे समजले होते, रागात घेतलेले निर्णय असेच असतात, ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येत नाही़ तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्के समजलंय. त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे? एकटीने सगळे जिंकले, लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही. ज्यांच्यासाठी काम केले त्यांनी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे. यापुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही. बसून कुरवळण्याएवढे काही नाही माझ्याजवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवित  आहे.  सगळ्या सहप्रवासी सहकाºयांचे हार्दिक आभार. मी आहे, कधीही या, घर आणि मी तुमचीच आहे. नमस्कार सगळ्यांना़ थांबते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस