शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

आधुनिक भारताच्या पायाभरणीत नेहरुंचा सिंहाचा वाटा : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 19:34 IST

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत गुंफले चौथे पुष्प

नांदेड : भारत जेव्हा इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यावेळेस या देशात प्रचंड दारिद्र्य होते. भूकबळीच्या घटना घडत होत्या. देशामध्ये साधी सुईसुध्दा बनविली जात नव्हती. अशा कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढून आधुनिकतेकडे नेण्याचा पं.जवाहरलाल नेहरु यांनी प्रयत्न केला. आज जो काही प्रगत भारत दिसतो त्याची पायाभरणी नेहरु यांनी केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व नागपूर लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. येथील यशवंत महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डी.पी.सावंत हे होते. तर यावेळी व्यासपीठावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव अ‍ॅड.उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य रावसाहेब शेंदारकर यांची उपस्थिती होती़

द्वादशीवार म्हणाले, पं.जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मोठे मतभेद असल्याचा अपप्रचार मागील अनेक वर्षांपासून केला जातो. परंतु वास्तवात त्यांच्यात काही मतभिन्नता जरी असली तरी, त्यांचे अनेक विषयांवर मतैक्य होते. देशाच्या जडणघडणीत दोघांनीही महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. केवळ वय अधिक व आजारपण पाठीमागे असल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. यामध्ये पं.जवाहरलाल नेहरु यांचा कोणताही दोष नव्हता. पं.नेहरु यांच्याविषयी काही जण अज्ञानातून तर बरेचजण जाणूनबुजून अफवा पसरविण्याचे व त्यांच्याविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करीत आहेत. ज्याअर्थी तब्बल ५५ वर्षानंतर सुध्दा त्यांच्या नावाचा उल्लेख या देशात वारंवार केला जातो, त्याअर्थी त्यांचे काम निश्चितच मोठे होते.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या  पोलीस अ‍ॅक्शनसंदर्भात दोन्ही  नेत्यांची एकवाक्यता होती. खरे तर मौलाना अबुल कलाम यांच्यावर हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी काँग्रेसने दिली होती. परंतु, त्यांनी विनम्र नकार दिल्यामुळे वल्लभभाई पटेल यांनी ही जबाबदारी यशस्वी  पार पाडून निजामाच्या जोखडातून हैदराबाद राज्य मुक्त केले. यासाठी पं.नेहरु यांनी त्यांना पूर्ण मोकळीक दिली होती.महाराष्ट्राच्या जडणघडणीत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासारखी हिमालयाएवढी कर्तृृत्ववान माणसे     या परिसरात जन्मली याचा आपणास अभिमान वाटला पाहिजे. एका संन्यस्त व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हैदराबाद  मुक्तिसंग्रामाचा लढा दिल्या गेला. त्यामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण यांच्यासारखे त्यागी व्यक्ती असल्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

पंडित नेहरु होते म्हणूनच जम्मू-काश्मीर भारतातकाश्मीर प्रश्नाबाबत द्वादशीवार म्हणाले, काश्मीरचा प्रश्न हा मुळामध्ये राजा हरिसिंग यांच्यामुळे निर्माण झाला़ कपट, कारस्थान करुन राजा हरिसिंगांनी काश्मीरचे राज्य मिळविले होते. हा राजा पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना खेळवत ठेवत होता. जेव्हा पाकिस्तानी टोळ्यांनी श्रीनगरपर्यंत मजल मारली. तेव्हा राजा हरिसिंगांनी भारताकडे मदत मागितली. आधी विलिनीकरण व त्यानंतरच मदत ही भूमिका नेहरुंनी घेतली़ केवळ पं. नेहरु होते म्हणूनच जम्मू-काश्मीर आज भारतामध्ये आहे. काश्मीरचा प्रश्न हा राजकीय किंवा धार्मिक नसून तो लष्करी प्रश्न आहे. जी लढाई १४ महिने चालली ती केवळ एक किंवा दोन आठवडे पुढे रेटली असली तरी, आपल्याला पाकव्याप्त काश्मीर जिंकता आला नसता, असेही ते म्हणाले.

गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न डी.पी.सावंत म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पं.जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या नेत्यांना पक्षाच्या चौकटीत बांधणे चुकीचे आहे. नेहरुंविषयी गैरसमज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. पं.नेहरु यांच्याच परवानगीने मराठवाड्यातील पैठण येथील महाकाय जायकवाडी धरण डॉ.शंकरराव चव्हाण यांनी बांधले. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूNandedनांदेडSocialसामाजिक