शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या विकासाच्या शैक्षणिक धोरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

नांदेड : विकासाच्या सर्व वाटा शिक्षणातूनच उद्भवतात. पण कोरोनामुळे विकासाचे इंजिन असलेले शिक्षणच थांबले आहे. खेड्यांच्या गरजा समोर ठेवून ...

नांदेड : विकासाच्या सर्व वाटा शिक्षणातूनच उद्भवतात. पण कोरोनामुळे विकासाचे इंजिन असलेले शिक्षणच थांबले आहे. खेड्यांच्या गरजा समोर ठेवून वंचितांच्या विकासाचे शैक्षणिक धोरण राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी मराठवाडा जनता विकास परिषद व राज्यशास्त्र विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेडतर्फे कोरोना काळातील मराठवाड्याच्या विकासाची स्थिती या विषयावर ६ व ७ रोजी आयोजित ऑनलाईन वेबीनारच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. मजविपचे सचिव प्राचार्य जीवन देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मराठवाड्यातील उद्योगाची स्थिती या विषयावर बोलताना प्रसिद्ध उद्योजक व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य मुकुंद कुलकर्णी म्हणाले, कोरोनाने प्रतिकूलतेची परिस्थिती निर्माण झाली हे खरे असले तरी उद्योजकीय मानसिकता असणार्‍यांसाठी हा काळ पूरकच आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी शासकीय व प्रशासकीय आणि नागरी शिस्तीची गरज आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी विभागवार अनुशेष न काढता जिल्हा हा घटक गृहित धरून अनुशेष काढल्याने मराठवाड्याच्या विकासावर फार मोठा अन्याय झाला आहे. त्यासाठी मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींनी व जनतेने सांघिकपणे लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी कार्यकारी संचालक व इंजि. शंकरराव नागरे यांनी केले.

मजविप व पीपल्स कॉलेजतर्फे आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात बोलतांना कोरोना काळातील मराठवाड्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण या विषयावर माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे म्हणाले, कोरोना काळात ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती चिंताजनक बनली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ब्रीज कोर्स सुरू करावा लागेल. मराठवाड्यातील विविध केंद्रातून कार्यरत असलेल्या केंद्र प्रमुख व शिक्षकांना प्रशिक्षण व कार्य करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्याची आजही गरज असून गाव विकासाचे एकमेव परिमाण शाळा हेच आहे. यावेळी बोलतांना मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे म्हणाले, कोरोनाकाळात मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यू झाले. कारण महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात आरोग्य क्षेत्रात भौतिक सुविधांबाबत आपण कुपोषितच आहोत. ग्रामीण व आदिवासी भागात आजही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. मराठवाड्यात मल्टीस्पेशालिटी सेवा उपलब्ध असलेले एकही अद्ययावत सेंटर नाही. पुरेसे कर्मचारी नाहीत. म्हणून यापुढे मराठवाड्याच्या आरोग्य सुविधांसाठी विशेष अनुदान देऊन भौतिक सुधारणांची गरज आहे.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. काब्दे म्हणाले, या ऑनलाईन चर्चासत्राच्या माध्यमातून कोरोना काळातील मराठवाड्याच्या विकासाची स्थिती या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींनी मांडलेल्या चिंतनातील महत्त्वाचे विकास विषयक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी यापुढे मराठवाड्यातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ. तसेच तज्ज्ञांचे सल्ले घेऊन न्यायालयीन लढे उभारू व मराठवाड्याच्या विकासासाठी लोकलढा उभारावा लागेल. तरच मराठवाड्याला न्याय मिळेल. त्यासाठी यापुढे मजविप पुढाकार घेऊन कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला.

ऑनलाईन वेबीनारमध्ये माजी आमदार डी. के. देशमुख, माजी आमदार पंडितराव देशमुख, माजी प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले, इंजि. या. रा. जाधव, अ‍ॅड. विजय देशमुख, प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, डॉ. विकास सुकाळे, डॉ. डी. एन. मोरे, प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, प्रा. डी. पी. डिगोळे, प्रा. डॉ. मथू सावंत, प्रा. डॉ. मनीषा गहिलोत, प्रा. अमोल काळे, राहुल गवारे इत्यादींसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

या दोन दिवशी ऑनलाईन वेबीनार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजविपचे सहसचिव व संयोजक डॉ. अशोक सिध्देवाड यांनी केले तर आभार डॉ. अभय दातार व डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी मानले.