शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘एनसीबी’च्या धाडींनी नांदेड जिल्हा पाेलीस दलाच्या कर्तव्य दक्षतेवरच प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 20:04 IST

NCB Raids In Nanded : एनसीबीच्या दाेन धडक कारवायांनी जिल्हा पाेलिसांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

नांदेड : एनसीबीने (NCB ) आठवडाभरात पाठोपाठ दोन धाडी जिल्ह्यात यशस्वी केल्याने स्थानिक पोलिसांच्या एकूणच कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या कारवाईने नांदेड हे अंमली पदार्थांची तस्करी, साठा, वाहतूक व वापराचे प्रमुख केंद्र बनत अल्स्याचे समोर आले आहे. ( NCB Raids In Nanded, Question Marks On Police ) 

एनसीबीच्या मुंबईतील पथकाने सतत पाळत ठेवून आंध्र प्रदेशातून नांदेडमार्गे खान्देशात जाणारी काेट्यवधी रुपयांच्या गांजाची खेप पकडली. थेट वरच्या स्तरावरून झालेल्या या कारवाईने स्थानिक पाेलीस प्रशासन अस्वस्थ असतानाच एनसीबीने जिल्हा पाेलिसांना नुकताच दुसरा धक्का दिला. येथून डाेडा हे अंमली पदार्थ जप्त केले गेले. त्याचा कारखाना उद्ध्वस्त केल्याचे एनसीबीने म्हटले आहे. एनसीबीच्या या दाेनही धडक कारवायांनी जिल्हा पाेलिसांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एनसीबीची चमू आठवडाभर पाळत ठेवून व मुंबईहून भल्या पहाटे नांदेड जिल्ह्यात येऊन १ हजार १२७ किलाे गांजाची खेप पकडते आणि स्थानिक पाेलिसांना याबाबत पुसटशी कल्पनाही नसावी, हे एक कोडेच आहे. खुद्द एनसीबीनेही याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे.

एनसीबीच्या कारवाईने नांदेड शहरच नव्हे तर, ग्रामीण क्षेत्रसुद्धा अंमली पदार्थाच्या तस्करी व साठ्याचे शिवाय कच्चा माल आणून अंमली पदार्थाच्या निर्मितीचे केंद्र बनल्याचे अधाेरेखित झाले आहे. जिल्ह्याला तेलंगाणा-आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांची सीमा लागून आहे. या सीमावर्ती भागातूनच अंमली पदार्थ, प्रतिबंधित गुटखा, सुपारी माेठ्या प्रमाणात नांदेडमध्ये आणली जाते. याच मार्गाने ती इतर राज्यात व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात पाेहाेचविली जाते. एवढे सगळे हाेत असताना पाेलिसांकडून मात्र गांजाची छुटपूट केस करून रेकाॅर्डवर ‘कामगिरी’ दाखविली जाते. एनसीबीच्या कारवाईने अशा कामगिरीसाठी नांदेड शहर व जिल्ह्यात पाेलिसांना प्रचंड वाव असल्याचे स्पष्ट हाेते. एनसीबीने पाठाेपाठ दाेन ठिकाणी टाकलेल्या धाडींनी जिल्हा पाेलिसांचे अपयश उघड केले आहे. किमान आतातरी जिल्हा पाेलीस अंमली पदार्थाची तस्करी राेखण्यासाठी स्थानिक पातळीवर माेहीम उघडतील काय?, याकडे लक्ष लागले आहे.

नांदेड दंगलीने ‘उद्ध्वस्त नेटवर्क’चा मुद्दा ऐरणीवरनांदेडमध्ये अचानक दंगल उसळली. पाेलिसांवर दगडफेक करण्यात आली. ही घटना पाहता पाेलीस कमालीचे बेसावध असल्याचे दिसून आले. या घटनेने इंटेलिजन्स ब्युराे (आयबी), राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), जिल्हा विशेष शाखा (डीएसबी) आणि पाेलीस ठाण्यांची खुफिया यंत्रणा या सर्वांचेच खबऱ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. मात्र उच्चपदस्थ पाेलीस प्रशासन पाेलिसांचे हे अपयश मानण्यास तयार नाहीत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर यंत्रणेला १०० टक्के खरीच माहिती मिळेल हे सांगणे कठीण आहे. या दंगलीनंतर दाेन दिवसांनी (१६ नाेव्हेंबर दरम्यान) पुन्हा दगडफेक हाेईल असा अंदाज प्रमुख गुप्तचरांनी अप्पर पाेलीस महासंचालक संजीवकुमार यांच्यापुढे वर्तविला हाेता. मात्र प्रत्यक्षात ही दगडफेक झाली नाही. यावरून गुप्तचरांचा अंदाज खोटा ठरल्याचे स्पष्ट होते.

दंगल वेळीच राेखण्यात पाेलीस यशस्वीअचानक व अनपेक्षितरित्या जमाव रस्त्यावर उतरल्याने दगडफेक व तणावाची स्थिती निर्माण झाली असली तरी ती नियंत्रित करण्यात व दंगल आणखी पसरू न देण्यात जिल्हा पाेलीस यशस्वी झाल्याचे उच्चपदस्थ पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एक दिवस निर्माण झाला व त्याचदिवशी संपला. ताे शहराच्या इतर भागात पसरू न देणे हीच पाेलिसांची खास कामगिरी राहिली. अन्य जिल्ह्यात मात्र हाच तणाव अनेक दिवस कायम राहून संचारबंदी लावण्याची वेळ आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. दंगल उसळलेल्या इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास नांदेड जिल्हा पाेलिसांची कामगिरी घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात सरस ठरल्याचे प्रमाणपत्रही या अधिकाऱ्याने दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोNandedनांदेड