शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यात ४७ गावांसाठीची राष्ट्रीय पेयजल योजना ५ वर्षांपासून कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:11 IST

पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़

- गोविंद शिंदेकंधार (नांदेड ) : तालुक्यातील ४७ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या़ गावाच्या लोकसंख्येनुसार मंजुरी देऊन पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात आला़ या योजनेअंतर्गत कंधार तालुक्यातील ४७ गावांसाठी २०१३ मध्ये योजना मंजूर करण्यात आल्या़ मात्र पाच वर्षे उलटली तरीही यातील बहुतांश कामे कागदावरच असल्याचे दिसते़ या कार्यक्रमांतर्गत काटकळंबासाठी ४६ लाख १७ हजार, मंगनाळी व वाडी २२ लाख, मसलगा ३१ लाख ४३ हजार, शिरूर २९ लाख ८२ हजार, राहटी १९ लाख ३७ हजार, नंदनवन ४५ लाख २२ हजार, आलेगाव ५३ लाख ६६ हजार, बाचोटी ५२ लाख २१ हजार, बामणी ४० लाख ८१ हजार, सावळेश्वर २९ लाख ४६ हजार, भंडारकुमठ्याची वाडी १८ लाख ९८ हजार, गोणार २४ लाख ९८ हजार, खंडगाव २६ लाख ९२ हजार, मादाळी १२ लाख ३ हजार यासह तालुक्यातील ४७ गावांत ९ कोटी ४४ लाख ४ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता़

निधी वितरित केल्यानंतर संबंधित गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल, अशी अपेक्षा होती़ मात्र पाच वर्षे उलटली तरी बहुतांश योजना अर्धवट असल्याने पाणीटंचाई कायम आहे़ सद्य:स्थितीत कंधार तालुक्यातील अनेक गावांत टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली असून टँकरसाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले जात आहेत़ योजनेतून पाणीपुरवठा योजनेची कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली असती तर या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नसता़ दरम्यान, मराठा महासंग्राम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे़ 

... म्हणे ग्रामसेवकाने कागदपत्रेच दिली नाहीतराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत सावळेश्वरचे ग्रामसेवक के़एम़ हाम्पले यांना विचारले असता, योजना अपूर्ण असल्याचे सांगत मागील ग्रामसेवकाने योजनेबाबतची कागदपत्रे पदभारावेळी दिली नसल्याची तक्रार केली़ तर काटकळंबाचे ग्रामविकास अधिकारी एस़ के़ खंडारे यांनी या योजनेसाठी जेवढा निधी मिळाला तेवढा खर्ची झाल्याचे सांगत निधीअभावी कामे अपूर्ण असल्याची कबुली दिली़

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकारNanded zpनांदेड जिल्हा परिषद