शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कंधार तालुक्यात ४७ गावांसाठीची राष्ट्रीय पेयजल योजना ५ वर्षांपासून कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:11 IST

पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़

- गोविंद शिंदेकंधार (नांदेड ) : तालुक्यातील ४७ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या़ गावाच्या लोकसंख्येनुसार मंजुरी देऊन पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात आला़ या योजनेअंतर्गत कंधार तालुक्यातील ४७ गावांसाठी २०१३ मध्ये योजना मंजूर करण्यात आल्या़ मात्र पाच वर्षे उलटली तरीही यातील बहुतांश कामे कागदावरच असल्याचे दिसते़ या कार्यक्रमांतर्गत काटकळंबासाठी ४६ लाख १७ हजार, मंगनाळी व वाडी २२ लाख, मसलगा ३१ लाख ४३ हजार, शिरूर २९ लाख ८२ हजार, राहटी १९ लाख ३७ हजार, नंदनवन ४५ लाख २२ हजार, आलेगाव ५३ लाख ६६ हजार, बाचोटी ५२ लाख २१ हजार, बामणी ४० लाख ८१ हजार, सावळेश्वर २९ लाख ४६ हजार, भंडारकुमठ्याची वाडी १८ लाख ९८ हजार, गोणार २४ लाख ९८ हजार, खंडगाव २६ लाख ९२ हजार, मादाळी १२ लाख ३ हजार यासह तालुक्यातील ४७ गावांत ९ कोटी ४४ लाख ४ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता़

निधी वितरित केल्यानंतर संबंधित गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल, अशी अपेक्षा होती़ मात्र पाच वर्षे उलटली तरी बहुतांश योजना अर्धवट असल्याने पाणीटंचाई कायम आहे़ सद्य:स्थितीत कंधार तालुक्यातील अनेक गावांत टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली असून टँकरसाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले जात आहेत़ योजनेतून पाणीपुरवठा योजनेची कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली असती तर या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नसता़ दरम्यान, मराठा महासंग्राम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे़ 

... म्हणे ग्रामसेवकाने कागदपत्रेच दिली नाहीतराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत सावळेश्वरचे ग्रामसेवक के़एम़ हाम्पले यांना विचारले असता, योजना अपूर्ण असल्याचे सांगत मागील ग्रामसेवकाने योजनेबाबतची कागदपत्रे पदभारावेळी दिली नसल्याची तक्रार केली़ तर काटकळंबाचे ग्रामविकास अधिकारी एस़ के़ खंडारे यांनी या योजनेसाठी जेवढा निधी मिळाला तेवढा खर्ची झाल्याचे सांगत निधीअभावी कामे अपूर्ण असल्याची कबुली दिली़

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकारNanded zpनांदेड जिल्हा परिषद