शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नांदेडकरांची पाण्यासाठी भटकंती; ३० मे पासूनच विष्णूपुरी प्रकल्प कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 15:10 IST

शहरात अपुऱ्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत़

ठळक मुद्देचालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़प्रत्यक्षात मृतजलसाठाही अत्यल्प असून कसेबसे पंप सुरू आहेत़

नांदेड : नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णूपुरी प्रकल्प ३० मे पासूनच कोरडा झाल्याने पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरू आहे़ शहरातील अनेक भागात तब्बल १० ते १२ दिवसांपासून पाणी आले नाही़ त्याचवेळी शहरात अपुऱ्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत़

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ चालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़ त्यातच दिग्रस बंधाऱ्यातूनही नांदेडला पाणी घेण्यात आले होते़ मात्र पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने आणि विष्णूपुरी प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने मे मध्येच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील मृत जलसाठ्यातून नांदेडकरांची तहान ३१ जुलैपर्यंत भागेल असे महापालिकेने म्हटले होते़ मात्र प्रत्यक्षात मृतजलसाठाही अत्यल्प असून कसेबसे पंप सुरू आहेत़ आता प्रशासकीय स्तरावर ऐनवेळी सिद्धेश्वर धरणातून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत़

प्रत्यक्षात सिद्धेश्वर धरणातही मृत जलसाठाच शिल्लक आहे़ त्यामुळे या प्रकल्पातून पाणी घेणार किती आणि त्यातील किती पाणी विष्णूपुरीपर्यंत पोहचेल हाही एक प्रश्नच आहे़ तब्बल १२० कि़मी़ अंतर कापून हे पाणी विष्णूपुरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ हे पाणी आल्यानंतरच शहरवासियांची तहान भागणार आहे़. शहरात पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडालेली असताना महापालिकेचे पदाधिकारी मात्र कुठेही पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढे आल्याचे अद्याप तरी दिसले नाहीत़  

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणwater scarcityपाणी टंचाई