शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन पूर्ण असूनही नांदेडकर शहर स्वच्छतेच्या प्रतीक्षेत, न्यायालयीन प्रक्रियेमुळे अंमलबजावणीस विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 17:45 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहर हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरलेले पाहण्यास नांदेडकर आतुर झाले आहेत.  मागील आठ महिन्यांपासून अस्वच्छतेचा सामना करावा लागलेल्या नांदेडकरांची ही प्रतीक्षा न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबली आहे. नववर्षाच्या प्रारंभी ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून स्वच्छतेच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र निविदा प्रक्रियेतील एक कंत्राटदार असलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी हा विषय उच्च न्यायालयात प्रविष्ठ केला.   या प्रकरणाची सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी ४ जानेवारीला आहे. तोपर्यंत शहर स्वच्छतेची निविदा अंतिम होण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नांदेड : स्वच्छ शहर, सुंदर शहर हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरलेले पाहण्यास नांदेडकर आतुर झाले आहेत.  मागील आठ महिन्यांपासून अस्वच्छतेचा सामना करावा लागलेल्या नांदेडकरांची ही प्रतीक्षा न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबली आहे. नववर्षाच्या प्रारंभी ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला आहे. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता तत्कालीन कंत्राटदाराने काम सोडले. मात्र त्यानंतर शहरवासियांचे झालेले हाल हे अविश्वसनीय होते. आजही शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते कचरामयच आहेत. मध्यंतरी निवडणुकीच्या धामधुमीत कचरा प्रश्न मागे पडला असला तरी प्रशासनाकडून मात्र शहर स्वच्छतेच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. डिसेंबर २०१७ च्या प्रारंभी ती पूर्णही झाली. मात्र निविदा प्रक्रियेतील एक कंत्राटदार असलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी हा विषय उच्च न्यायालयात प्रविष्ठ केला.  या प्रकरणाची सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी ४ जानेवारीला आहे. तोपर्यंत शहर स्वच्छतेची निविदा अंतिम होण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शहर स्वच्छतेसाठी आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा या मुंबईच्या ठेकेदाराची १६३१ रुपये प्रति मे. टन दराने कचरा उचलण्याची निविदा अंतिम करण्यात आली आहे.  या निविदा प्रक्रियेत दुसर्‍या क्रमांकाचे दर असलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी सदर काम आपल्याला द्यावे, असा दावा दाखल केला आहे. मुंबईच्या  आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा या ठेकेदाराचा अनुभव मुंबईचा असून नांदेडमध्ये तो यशस्वी होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. 

दरम्यान, महापालिकेने अंतिम केलेल्या आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा या ठेकेदाराकडून शहरात जवळपास १७० वाहनाद्वारे कचरा उचलण्याचे बंधनकारक करण्यात आल्याने त्यामध्ये सायकल रिक्षा ५०, टाटा एस-९०, टाटा ४०७ टेम्पो २०, एक जेसीबी, एक ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांचा समावेश आहे. 

या वाहनावर ३५३ मजूर  ठेकेदाराचे राहणार आहेत. त्याचवेळी महापालिका स्वच्छता विभागाचे कर्मचारीही कार्यालयात राहणार आहेत. कचरा ठेकेदाराकडून कचरा संकलन करणे, दैनंदिन रस्ते सफाई, नाले सफाई, घनकचर्‍यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, शहर कचरामुक्त करणे आदी कामे करुन घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, कचरा उचलणार्‍या सर्व गाड्या या जीपीएस सिस्टीमद्वारे नियंत्रित राहणार आहेत. महापालिका मुख्यालयात सदर वाहनांची कंट्रोलरुम निर्माण केली जाणार आहे.   निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात स्वच्छतेचे काम सुरू झाल्यावरच या नियोजनाचा उपयोग होणार आहे. त्यातून शहरवासीयांची कचर्‍याच्या ढिगार्‍यातून मुक्तता होणार आहे. 

निविदा प्रक्रिया पूर्णशहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला आहे. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता तत्कालीन कंत्राटदाराने काम सोडले. मात्र त्यानंतर शहरवासियांचे झालेले हाल हे अविश्वसनीय होते. आजही शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते कचरामयच आहेत. मध्यंतरी निवडणुकीच्या धामधुमीत कचरा प्रश्न मागे पडला असला तरी प्रशासनाकडून मात्र शहर स्वच्छतेच्या निविदेची प्रक्रिया   डिसेंबर २०१७ च्या प्रारंभी पूर्ण करण्यात आली.

पहिल्या निविदेत ५० लाख जप्तशहर स्वच्छतेसाठी २९ डिसेंबर २०१६ रोजी निविदा प्रक्रिया काढल्या होत्या. या प्रक्रियेला चारवेळा मुदतवाढ दिली. पाचव्यांदा दिलेल्या मुदतवाढीतही अवाजवी दरामुळे ती रद्द केली. ३ आॅगस्ट रोजी काढलेल्या निविदेत तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या.अमृत इंटरप्राईजेसचे सर्वात कमी दर आले होते. मात्र ऐनवेळी अमृतने माघार घेतल्याने त्या कंत्राटदाराचे ५० लाख रुपये जप्त करुन मनपाने काळ्या यादीत टाकले होते. 

महापालिका आयुक्तांचे उत्कृष्ट नियोजनआयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रशासकीय सेवेच्या अनुभवाचा निश्चितपणे या स्वच्छता निविदा अंतिम करण्यात उपयोग झाला आहे. शहरात पूर्वी असलेल्या ठेकेदाराकडे वाहनसंख्या १४८ होती. ती आता १७० वर जाणार आहे. किमान वेतन पूर्वी ४ हजार प्रतिमजूर होते. आता ते १६ हजार ३२० रुपये प्रतिमजूर दिले जाणार आहे. पूर्वी कंत्राटदारास कचरा उचलण्याचे बंधन हे १६० मे. टन होते ते आता प्रतिदिन १७५ मे. टनावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, पूर्वी कंत्राटदारास नवीन वाहन आणण्याचे बंधन नव्हते. आता कंत्राटदारास वाहनेही नवीन आणावी लागणार असून २०१७ नंतरचीच सर्व वाहने वापरात घ्यावी लागणार आहेत. यासाठी कंत्राटदारास तब्बल १२ कोटींची भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे. कंत्राटदारास पूर्वी मुदतवाढीसंदर्भात कोणतीही तरतूद नव्हती ती आता समाधानकारक काम असल्यास केवळ २ वर्षे मुदतवाढ देता येणार आहे. 

टॅग्स :Nandedनांदेड