शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेतील गैरकारभाराला अधिकाऱ्यांचेच पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:28 IST

महत्त्वाच्या विषयावरील बैठकीचा अनुपालन अहवाल तीन महिन्यानंतरही देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आक्रमक झाले. कर्मचा-यांच्या गैरकारभाराला अधिकारीच पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप करीत यावेळी पदाधिका-यांनी गदारोळ घातल्याने जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत पदाधिकारी आक्रमक : तीन महिन्यानंतरही अनुपालन अहवाल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महत्त्वाच्या विषयावरील बैठकीचा अनुपालन अहवाल तीन महिन्यानंतरही देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आक्रमक झाले. कर्मचा-यांच्या गैरकारभाराला अधिकारीच पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप करीत यावेळी पदाधिका-यांनी गदारोळ घातल्याने जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ही सभा घेण्यात आली. सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला माळाकोळी गटाचे सदस्य चंद्रसेन पाटील व नरसी गटाचे माणिक लोहगावे यांनी अनुपालन अहवालाचा विषय उपस्थित केला. ३१ जानेवारी रोजी आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वाची बैैठक घेण्यात आली होती. यात गैरव्यवहारांची मोठी प्रकरणे होती. शिक्षण विभागातील गोंधळासंबंधीही या बैठकीत चर्चा झाली होती.लाखो रुपये पाणीपुरवठा योजनांसाठी दिले आहेत. मात्र ती कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. ग्रामसेवकांकडून झालेल्या अपहाराचा मुद्दाही ३१ जानेवारीच्या बैठकीत चर्चेला आला होता. सदरची बैैठक होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र त्या बैैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने काय कारवाई झाली याबाबत अधिकारी बोलायला तयार नाहीत. एवढेच कशाला अनुपालन अहवाल देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याची तोफ माणिक लोहगावे यांनी डागली. यावेळी इतर उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांनीही गदारोळ करीत लोहगावे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. अनुपालन अहवालासाठी सभागृहात गोंधळ घालावा लागतो ही शोकांतिका असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी सेना-भाजपचे सदस्य आक्रमक झाले होते.प्रशासनाकडून वारंवार लोकप्रतिनिधींचा अपमान केला जात असल्याची खंत जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर यांनी व्यक्त करीत सार्वत्रिक बदल्यादरम्यान झालेल्या गोंधळावर त्यांनी बोट ठेवले. बदली प्रक्रियेवेळी कनिष्ठ सहायक कासराळीकर यांनी पदाधिकाºयांचा अपमान केल्याचा आरोप करीत जोपर्यंत त्यांचे निलंबन होणार नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांना हस्तक्षेप करावा लागला. कासराळीकर यांना निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले.माळेगाव यात्रा येथे लालकंधारी उपकेंद्र उभारण्याची मागणी जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील यांनी केली. यावर यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवू असे जि. प. अध्यक्षा जवळगावकर यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांसाठीच्या दलितवस्ती सुधार योजनेच्या नियोजनाचा आराखडा सादर करण्याचे आदेश देवूनही गटविकास अधिकाºयांनी आराखडा अद्यापही सादर केला नाही. अशा बीडीओंची यावेळी सभागृहात हजेरी घेण्यात आली. त्यानंतर येत्या १० जूनपर्यंत सदर आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांनी दिले. वेळेत आराखडे सादर न करणाºया बीडीओंवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याचबरोबर बदली प्रक्रिया पार पडली असली तरी अनेक अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत. अशांच्या लवकरच बदल्या करु, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.---तरोड्याची जागा १९८१ प्रमाणे ताब्यात घ्यातरोडा येथील खुल्या जागेचा मुद्दाही या सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला. १९८१ च्या जागा मोजणी अहवालानुसार या जागेच्या ज्या चतु:सीमा दाखविण्यात आल्या आहेत.त्यानुसारच सदर जागा जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. या चतु:सीमा बदलण्यास कोणत्या अधिकाºयांनी मदत केली? या प्रकारास कोण जबाबदार आहे? अशा सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असा मुद्दाही सभेत सदस्यांनी आक्रमकपणे मांडला. दरम्यान, शनिवारी झालेल्या या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आक्रमक झाल्याने अधिका-यांची गोची झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अनुपालन अहवाल सादर करण्यास विलंब करुन जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयात गैरकारभारांना का पाठीशी घालत आहेत? अशी चर्चाही जिल्हा परिषद परिसरात रंगली होती.---बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी पोलीस कारवाईबोगस जात प्रमाणपत्राचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही यासंबंधीचा मुद्दा जि. प. सदस्य साहेबराव धनगे यांनी उपस्थित केला. १८ वर्षांपूर्वी अनुसूचित जमाती प्रवर्गातून सहशिक्षिका म्हणून रुजू झालेल्या महिलेस व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करता आले नाही. त्यामुळे सदर शिक्षिका निघून गेली असता शिक्षण विभागातील काही अधिका-यांनी त्यांना परत बोलावून सर्वसाधारण प्रवर्गातून रुजू केले. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक अन् तितकाच संतापजनक असल्याचे सांगत या प्रकरणास जबाबदार असणाºया अधिकारी-कर्मचा-यांविरुद्ध पोलीस कारवाईची मागणी धनगे यांनी केली. यावर येत्या १५ दिवसांत कारवाईसंबंधी पोलीस ठाण्याला पत्र देण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी