शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

नांदेड जिल्हा परिषद, महसूल विभाग लाचखोरीत सर्वात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:30 IST

लाचखोरी विरोधात सर्वसामान्य नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील ११ महिन्यात नांदेड विभागातील चार जिल्ह्यात लाचखोरी संदर्भात ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषद आणि महसूल विभाग सर्वात अग्रभागी आहे.

ठळक मुद्दे७९ गुन्हे दाखल शिक्षेचे प्रमाण अवघे २५ टक्क्यांवरच

नांदेड : लाचखोरी विरोधात सर्वसामान्य नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील ११ महिन्यात नांदेड विभागातील चार जिल्ह्यात लाचखोरी संदर्भात ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषद आणि महसूल विभाग सर्वात अग्रभागी आहे. दरम्यान, गुन्ह्याचे प्रमाण वाढत असले तरी त्या प्रमाणात लाचखोरांना शिक्षा होत नसल्याचे विदारक वास्तव आहे. गुन्हे दाखल झालेल्यांपैकी अवघ्या २५ टक्के जणांनाच या गुन्हे अंतर्गत शिक्षा झालेली आहे.भ्रष्टाचाराविरोधात सर्वव्यापी जनजागरण सुरू आहे. या अनुषंगाने शासकीय कामकाजासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मागितल्या जाणा-या चिरीमिरी विरोधात नागरिक आता तक्रारीसाठी पुढाकार घेवू लागले आहेत. नांदेड विभागातून नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यात मागील ११ महिन्यात विविध अधिकारी, कर्मचा-यां विरोधात तब्बल ७९ गुन्हे दाखल झाले आहेत.यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २४, हिंगोली-२०, लातूर-१९ तर परभणी जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये १६ जणाविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सर्वसाधारणपणे शासकीय सर्वच विभागातील कर्मचा-याविरुद्ध या कलमाखाली गुन्हे दाखल झाले असले तरी जिल्हा परिषद आणि त्या पाठोपाठ महसूल विभाग लाचखोरीत पुढे असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. तब्बल २२ गुन्हे हे जिल्हा परिषदेशी संबंधित अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध दाखल झाले आहेत. तर त्या पाठोपाठ महसूल विभाग आहे. या विभागातील अधिकारी, कर्मचा-या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये १६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कायदा ज्यांच्या हातात आहे ते पोलिसही लाचखोरीत मागे राहिलेले नाहीत. १४ पोलीस अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध या कलमान्वये गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद, महसूल आणि पोलिस या तीन विभागाशी निगडीत अधिकारी, कर्मचारीच ७९ पैकी ५२ गुन्ह्यात सापडले आहेत. तर २७ प्रकरणे इतर विभागाशी संबंधित आहेत.दरम्यान, २०१७ या वर्षात नांदेड विभागात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये ९५ गुन्हे दाखल झाले होते. या संदर्भात या विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाठकर म्हणाले की, लाचखोरी विरोधात सर्वसामान्यांनी पुढे यावे, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्यात येत आहे. लाच घेणे आणि देणेही गुन्हा आहे. याचे भान आता सर्वांनाच येवू लागल्याने तक्रारींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळेच विभागात दररोज कुठे ना कुठे लाचखोरी विरोधात तक्रार दाखल होताना दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांनीही आता या विरोधात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.तक्रारदारांमुळे सुटतात आरोपीलाचेविरोधात नागरिक आता पुढे येत आहेत. त्यामुळेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल होणा-या गुन्ह्यांचे प्रमाण सगळीकडेच वाढल्याचे दिसते. मात्र असे असले तरी या कलमान्वये आरोपींना मिळणा-या शिक्षेचे प्रमाण अवघे २५ टक्के आहे. लाचखोरी संदर्भातील तक्रार मिळाल्यानंतर तक्रारीचीही खातरजमा केली जाते. आणि त्यानंतरच आरोपीला पकडले जाते. मात्र खटला अनेक वर्ष चालत राहतो. या कालावधीत तक्रारदार आणि आरोपीमध्ये समेट होतो. याचा परिणाम निकालावर होतो.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस