शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नांदेडमध्ये घरकुलांच्या लोकवाट्याची वसुली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:23 IST

शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे.

ठळक मुद्देबीएसयुपी योजनेत १८ हजार ६७६ घरकुलांचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेपुढे उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान उभे आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत बंद पडल्याने आता उत्पन्न वाढवायचे कसे याबाबत प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने मालमत्ताकराची वसुली, पाणी कराची वसुली याबाबत नियोजन केले जात आहे. दुसरीकडे शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत थकित असलेल्या लोकवाट्याची रक्कमही वसुल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उपायुक्त गीता ठाकरे यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.२०११ मध्ये शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत १८ हजार ६७६ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत बहुतांश लाभार्थ्यांनी आपला हिस्सा भरलाच नाही. १२ हजार लाभार्थ्याकडून वाटा वसुल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बीएसयुपी लाभधारकाकडील वाटा वसुल करण्यासाठी महापालिकेने वसुली पथक स्थापन केले आहे. सहा वर्षापासून थकलेला हा वाटा वसुल करताना मनपापुढे आडचणी येत असल्या तरी लाभार्थ्याकडून टप्प्याटप्प्याने वसुली केली जाईल असे उपायुक्त ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.शहरातील जयभीमनगरात लोकवाटा वसुलीला प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील अन्य भागातही हे विशेष वसुली पथके लवकरच पोहोचतील. त्यातून लोकवाटा वसुल होईल. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना २८ हजार रुपये लोकवाट्यापोटी भरायचे आहेत. तर मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्याना २५ हजार रुपये भरायचे आहेत. जवळपास ३० कोटी रुपये या विभागाकडून अपेक्षित आहेत.पाणीपट्टीचे मागणी बिले मालमत्ताधारकांना देणारशहरात असलेल्या नळ जोडणी धारकांकडून मोठी वसुली अपेक्षित आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या दप्तर दिरंगाईमुळे मागील तीन ते चार वर्षापासून पाणी कराची वसुली झालीच नाही. त्याचवेळी नेमकी मागणी किती आहे याबाबतही संभ्रमही निर्माण झाला आहे. मागणी निश्चित झाल्यानंतर नळधारकांना बिले दिली जाणार आहेत. त्यानंतर महापालिका विशेष पाणी कर वसुली मोहीम राबविणार आहे. त्याचवेळी शहरात असलेल्या अनधिकृत नळ जोडणीबाबतही कारवाई अपेक्षित आहे. अवैध नळजोडणी घेणाऱ्यांकडून दंड आकारणी करुन ते नळ कनेक्शन नियमित केले जाणार आहेत.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTaxकरWaterपाणी