शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पर्यायी पाण्यासाठी नांदेड महापालिका सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:32 IST

शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देमहापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव विष्णूपुरीत मार्चपर्यंतचेच पाणी उपलब्ध

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली.विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ ३९.४९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा मार्च अखेरपर्यंत पुरणार आहे. त्याचवेळी प्रकल्पाच्या उपरोक्त भागातील धरणेही कोरडी पडल्याने पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे आहे त्याच पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पाणीप्रश्नाचे हे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेतली. प्रकल्प क्षेत्रातील डीपींचा विद्युतपुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला आदेशित करावे. त्याचवेळी प्रशासनाने स्थापन केलेल्या दक्षता पथकाला आदेश देवून पाणी उपसा करणारे विद्युतपंप जप्त करावे. प्रकल्पातून आजघडीला जवळपास ०.५७ दलघमी पाणी उपसले जात आहे.राज्य वितरण कंपनीला आदेश देवून एक्स्प्रेस फीडर बंद करावे, तसेच अवैध पाणीउपसा रोखावा, अशी मागणीही जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. त्याचवेळी शहरात पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे आदेशही महापौरांनी दिले आहेत. शहरात असलेल्या विंधन विहिरी, हातपंप दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचवेळी शहराची मदार आता पैनगंगेच्या पाण्यावर काही प्रमाणात राहणार आहे. मात्र, हे पाणी सिंचन पाळ्यासाठी पाणी सोडल्यानंतरच महापालिकेला मिळणार आहे. पैनगंगेत १५ दलघमी पाणी महापालिकेने आरक्षित केले आहे. यातील दोन दलघमी पाणी पहिल्या टप्प्यात उचलण्यात आले आहे.

  • विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात पथकांची निर्मिती केली आहे. मात्र ही सात पथके अद्यापही पूर्ण क्षमतेने कार्यरत न झाल्याने विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा सुरुच आहे.पथक क्र.२ मध्ये समाविष्ट असलेल्या नांदेड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही.आर. ऐटवार, नांदेड ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कदम, महावितरणचे लाईनमन शिंदे आणि वसरणीचे मंडळ अधिकारी बी.एस. देशमुख हे पथकाच्या कामावर सातत्याने गैरहजर असल्याचे पथकप्रमुख एस.एस. कोडगिरे यांनी कळविले आहे.
  • विष्णूपुरी क्षेत्रातील पथकाचीच ही अवस्था आहे.तर अन्य पथकांबाबत न बोललेलेच बरे !अशीच परिस्थिती आहे. प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत असताना पथकातील अधिकारी-कर्मचारी नियमितपणे अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी कार्यरत राहणे आवश्यक असताना ते गैरहजर आहेत. या गैरहजर अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करावी, असे पत्र विष्णूपुरी पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिका-यांनी नांदेड उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे आता गैरहजर राहणा-या कर्मचा-यावर कारवाई होते की ‘जैसे थे’ च परिस्थिती राहील, हे पहावे लागणार आहे.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका