शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नांदेड लोकसभा : ३६ उमेदवारांनी घेतले ९६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:03 AM

लोकसभा निवडणुकीत १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे़ त्यात शुक्रवारी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले़ आतापर्यंत ११५ जणांनी २४० उमेदवारी अर्ज नेले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़ अमिता चव्हाण यांच्यासह भाजपाचे संतुकराव हंबर्डे व संजय कौडगे यांनीही अर्ज घेतले आहेत़

ठळक मुद्देभाजपच्या दोघांचा तर सेनेच्या एकाचा समावेश

नांदेड : लोकसभा निवडणुकीत १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे़ त्यात शुक्रवारी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले़ आतापर्यंत ११५ जणांनी २४० उमेदवारी अर्ज नेले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़ अमिता चव्हाण यांच्यासह भाजपाचे संतुकराव हंबर्डे व संजय कौडगे यांनीही अर्ज घेतले आहेत़ दररोज अर्ज नेले जात असले तरी प्रमुख पक्षांनी मात्र आपले पत्ते अद्यापही उघड केले नाहीत़लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघासाठी २६ मार्चपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे़ २७ मार्चला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून २९ मार्चला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे़ उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल केला होता़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही अपक्षांनी उमेदवारी दाखल केली़तर काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण व आ़ अमिता चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आले होते़ धुळवडीनिमित्त सुटी असल्याने शुक्रवारी दिवसभरात ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले आहेत़ सोमवारी उर्सची सुटी असली तरी, अर्जस्वीकृती मात्र सुुरु राहणार आहे़शुक्रवारी एकूण सहा जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे़ त्यामध्ये साहेबराव भिवा गजभारे, शेख मुनीर शेख युसूफ, लतिफ उल जफर कुरेशी यांचे दोन, तुकाराम गणपत बिराजदार, अ‍ॅड़सुभाष खेम्मा जाधव, अल्ताफ अहमद इक्बाल अहमद, शेख इम्रान शेख मस्तान यांचा समावेश आहे़ या सर्व उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे़संतुक हंबर्डे, कौडगे यांनी घेतले अर्जबुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी खा़अशोकराव चव्हाण तर आ़अमरनाथ राजूरकर यांनी आ़अमिताताई चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले होते़ त्यानंतर शुक्रवारी भाजपाचे महानगराध्यक्ष संतुक हंबर्डे आणि संजय कौडगे या दोघांनी अर्ज घेतले आहेत़ तर दुसरीकडे भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांनीही उमेदवारी अर्ज घेवून सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले आहे़ उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांनी अद्यापही पत्ते उघड केले नसले तरी, हा खेळ शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे़आचारसंहितेमुळे होमगार्ड भरती पुढे ढकललीजिल्हा होमगार्ड विभागातील रिक्त असलेल्या ३२५ जागांसाठी २५ ते २७ मार्च दरम्यान होणारी भरती प्रक्रिया आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली असून आचारसंहिता संपल्यानंतरच भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी दिली़ नांदेड मुख्यालयातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील १७२ पुरुष तर १५३ महिला होमगार्डच्या रिक्त पदासाठी २५ ते २७ मार्च दरम्यान नावनोंदणी करण्यात येणार होती़ २५ मार्च रोजी सकाळी आठ वाजेपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती़ त्यासाठी उमेदवारांनीही जय्यत तयारी केली होती़ परंतु भरती प्रक्रियेच्या काळातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे़

  • जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या काळात पैशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येते़ त्यावर आवर घालण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून गुुरुवारी रात्री इतवारा भागात नाकाबंदी करीत असताना एका चालकाकडे एक लाख रुपये आढळून आले़ पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून या रकमेबाबत व्यापाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही़ गुरुवारी धुळवडीनिमित्त शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ त्यानंतर रात्री नावघाट येथे नाकाबंदी लावण्यात आली होती़ यावेळी (एम़एच़२६, बीक़े़७०४४) या क्रमांकाच्या दुचाकीला पोलिसांनी अडविले़ या दुचाकीची तपासणी केली असता त्याच्या डिक्कीत एक लाख रुपयांची रक्कम आढळली़ ही रक्कम पोलिसांनी जप्त केली़
टॅग्स :NandedनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग