शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Nanded: लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार; उमरा गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:16 IST

तालुक्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे.

- गोविंद कदमलोहा : तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू असून सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील उमरा गावात पाणी शिरल्यामुळे सात ते आठ कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत तसेच गावातील काही घरांमध्ये आसरा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी व जिल्हा परिषद उपअभियंता शिवाजी राठोड यांनी दिली आहे.

लिंबोटी धरणाचे तब्बल १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रासह परिसरातील गावांमध्ये पाणी वाढले असून अनेक ठिकाणी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, हळद यांसारख्या पिकांवर पावसाचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे हातचे पीक पाण्यात बुडाले आहे. इतकेच नव्हे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे.

दरम्यान, लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी तसेच आपत्ती व्यवस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा कमी पडू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून उमरा येथे तातडीने आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले आहे. सततचा पाऊस, धरणांमधील विसर्ग आणि नदीपात्रातील वाढते पाणी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडfloodपूरRainपाऊस